• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कणकवली सेतू सुविधा केंद्रातील गैरसोयीवरून माजी आमदार वैभव नाईक आक्रमक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
कणकवली सेतू सुविधा केंद्रातील गैरसोयीवरून माजी आमदार वैभव नाईक आक्रमक
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहून अधिकाऱ्यांना फैलावर

“सर्वांची कामे पूर्ण झाल्याशिवाय केंद्र बंद करू नका” – वैभव नाईक

कणकवली | प्रतिनिधी | दि. २६ मे

कणकवली तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात नागरिकांची होत असलेली गैरसोय पाहून कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक चांगलेच आक्रमक झाले. गुजरात इन्फोटेक लिमिटेड कंपनीमार्फत चालविण्यात येणाऱ्या या सेतू सुविधा केंद्रात प्रतिज्ञापत्रे व इतर कागदपत्रांसाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यावरून वैभव नाईक यांनी कंपनीचे व्यवस्थापक श्री. पावसकर यांना कडक शब्दांत जाब विचारला.

RelatedPosts

पुणे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी

घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा

शहाद्यात संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी; वधू-वर परिचय पीडीएफचे प्रकाशन.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिज्ञापत्रांसाठी केंद्रात केवळ एकच टेबल सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे सकाळपासून नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते. अनेक नागरिक विविध गावांतून कणकवली तहसील कार्यालयात आले होते. दुपारी २ वाजता सेतू सुविधा केंद्राचा दरवाजा बंद केला जात असल्याची तक्रार नागरिकांनी वैभव नाईक यांच्याकडे केली.

यावर संतप्त होत वैभव नाईक यांनी, “रांगेत उभ्या असलेल्या सर्व नागरिकांची कामे पूर्ण झाल्याशिवाय सेतू सुविधा केंद्र बंद करायचे नाही,” असा स्पष्ट इशारा व्यवस्थापनाला दिला. तसेच नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

तहसीलदारांवरही नाराजी

नागरिकांची मोठी गर्दी आणि गैरसोय सुरू असताना तहसीलदार मात्र केबिनमध्ये बसून ए.सी.ची हवा घेत असल्याचा आरोप करत वैभव नाईक यांनी प्रशासनावरही नाराजी व्यक्त केली. “नागरिकांना दाखले व प्रतिज्ञापत्रांसाठी चार-चार दिवस हेलपाटे मारावे लागत आहेत. महसूल विभागाने आधी ही परिस्थिती सुधारली पाहिजे,” असे ते म्हणाले.

विशेष म्हणजे, नागरिकांची रांग शौचालयाजवळ लावण्यात आल्याने दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. एवढ्या गंभीर परिस्थितीत अधिकारी मात्र नागरिकांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

“मी पुन्हा येऊन पाहणी करणार”

यावेळी वैभव नाईक यांनी व्यवस्थापक श्री. पावसकर यांना, “तुम्ही कोणत्या उपाययोजना केल्या हे पाहण्यासाठी मी पुन्हा दुपारी ३ वाजता येथे येणार आहे,” असेही स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर सेतू सुविधा केंद्रातील कामकाजाला वेग आला आणि उपस्थित नागरिकांची प्रतिज्ञापत्रे व दाखले सायंकाळपर्यंत पूर्ण करून देण्यात आले.

यामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र संपूर्ण गोंधळ आणि गर्दी सुरू असतानाही तहसीलदार शेवटपर्यंत बाहेर न आल्याने नागरिकांनी त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली.

पत्रकारांशी बोलताना वैभव नाईक यांनी सांगितले की, “महसूल विभागाकडून घरपोच सेवा देण्याच्या घोषणा केल्या जातात, पण प्रत्यक्षात नागरिकांना साध्या कामांसाठी अनेक दिवस त्रास सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे.”

Tags: Amit Tendulakr
Previous Post

“समस्या न सुटल्यास वीज अधिकाऱ्यांना गावात फिरू देणार नाही”; वीज ग्राहक संघटना आक्रमक

Related Posts

पुणे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी
ताज्या घडामोडी

पुणे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी

May 27, 2026
25
घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा
ताज्या घडामोडी

घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा

May 27, 2026
53
शहाद्यात संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी; वधू-वर परिचय पीडीएफचे प्रकाशन.
ताज्या घडामोडी

शहाद्यात संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी; वधू-वर परिचय पीडीएफचे प्रकाशन.

May 27, 2026
17
शहाद्यात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाची २८ मे रोजी महाप्रसादाने होणार सांगता.
ताज्या घडामोडी

शहाद्यात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाची २८ मे रोजी महाप्रसादाने होणार सांगता.

May 27, 2026
5
शिर्डी येथे युवा क्रांती फाऊंडेशनचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

शिर्डी येथे युवा क्रांती फाऊंडेशनचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न

May 27, 2026
17
कश्यपी धरणात काळाचा घाला; चिमुकल्याला वाचवताना पती-पत्नींसह चौघांचा मृत्यू
ताज्या घडामोडी

कश्यपी धरणात काळाचा घाला; चिमुकल्याला वाचवताना पती-पत्नींसह चौघांचा मृत्यू

May 27, 2026
10

ताज्या बातम्या

कणकवली सेतू सुविधा केंद्रातील गैरसोयीवरून माजी आमदार वैभव नाईक आक्रमक

कणकवली सेतू सुविधा केंद्रातील गैरसोयीवरून माजी आमदार वैभव नाईक आक्रमक

May 27, 2026
“समस्या न सुटल्यास वीज अधिकाऱ्यांना गावात फिरू देणार नाही”; वीज ग्राहक संघटना आक्रमक

“समस्या न सुटल्यास वीज अधिकाऱ्यांना गावात फिरू देणार नाही”; वीज ग्राहक संघटना आक्रमक

May 27, 2026
पुणे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी

पुणे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी

May 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In