• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कणकवली सेतू सुविधा केंद्रातील गैरसोयीवरून माजी आमदार वैभव नाईक आक्रमक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
कणकवली सेतू सुविधा केंद्रातील गैरसोयीवरून माजी आमदार वैभव नाईक आक्रमक
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहून अधिकाऱ्यांना फैलावर

“सर्वांची कामे पूर्ण झाल्याशिवाय केंद्र बंद करू नका” – वैभव नाईक

कणकवली | प्रतिनिधी | दि. २६ मे

कणकवली तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात नागरिकांची होत असलेली गैरसोय पाहून कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक चांगलेच आक्रमक झाले. गुजरात इन्फोटेक लिमिटेड कंपनीमार्फत चालविण्यात येणाऱ्या या सेतू सुविधा केंद्रात प्रतिज्ञापत्रे व इतर कागदपत्रांसाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यावरून वैभव नाईक यांनी कंपनीचे व्यवस्थापक श्री. पावसकर यांना कडक शब्दांत जाब विचारला.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिज्ञापत्रांसाठी केंद्रात केवळ एकच टेबल सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे सकाळपासून नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते. अनेक नागरिक विविध गावांतून कणकवली तहसील कार्यालयात आले होते. दुपारी २ वाजता सेतू सुविधा केंद्राचा दरवाजा बंद केला जात असल्याची तक्रार नागरिकांनी वैभव नाईक यांच्याकडे केली.

यावर संतप्त होत वैभव नाईक यांनी, “रांगेत उभ्या असलेल्या सर्व नागरिकांची कामे पूर्ण झाल्याशिवाय सेतू सुविधा केंद्र बंद करायचे नाही,” असा स्पष्ट इशारा व्यवस्थापनाला दिला. तसेच नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

तहसीलदारांवरही नाराजी

नागरिकांची मोठी गर्दी आणि गैरसोय सुरू असताना तहसीलदार मात्र केबिनमध्ये बसून ए.सी.ची हवा घेत असल्याचा आरोप करत वैभव नाईक यांनी प्रशासनावरही नाराजी व्यक्त केली. “नागरिकांना दाखले व प्रतिज्ञापत्रांसाठी चार-चार दिवस हेलपाटे मारावे लागत आहेत. महसूल विभागाने आधी ही परिस्थिती सुधारली पाहिजे,” असे ते म्हणाले.

विशेष म्हणजे, नागरिकांची रांग शौचालयाजवळ लावण्यात आल्याने दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. एवढ्या गंभीर परिस्थितीत अधिकारी मात्र नागरिकांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

“मी पुन्हा येऊन पाहणी करणार”

यावेळी वैभव नाईक यांनी व्यवस्थापक श्री. पावसकर यांना, “तुम्ही कोणत्या उपाययोजना केल्या हे पाहण्यासाठी मी पुन्हा दुपारी ३ वाजता येथे येणार आहे,” असेही स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर सेतू सुविधा केंद्रातील कामकाजाला वेग आला आणि उपस्थित नागरिकांची प्रतिज्ञापत्रे व दाखले सायंकाळपर्यंत पूर्ण करून देण्यात आले.

यामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र संपूर्ण गोंधळ आणि गर्दी सुरू असतानाही तहसीलदार शेवटपर्यंत बाहेर न आल्याने नागरिकांनी त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली.

पत्रकारांशी बोलताना वैभव नाईक यांनी सांगितले की, “महसूल विभागाकडून घरपोच सेवा देण्याच्या घोषणा केल्या जातात, पण प्रत्यक्षात नागरिकांना साध्या कामांसाठी अनेक दिवस त्रास सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे.”

Tags: Amit Tendulakr
Previous Post

“समस्या न सुटल्यास वीज अधिकाऱ्यांना गावात फिरू देणार नाही”; वीज ग्राहक संघटना आक्रमक

Next Post

कन्नड तालुक्यासाठी ऐतिहासिक घोषणा; शेतकऱ्यांनी जमीन दिल्यास कन्नडमध्ये भव्य MIDC उभारणार – उद्योगमंत्री उदय सामंत

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
कन्नड तालुक्यासाठी ऐतिहासिक घोषणा; शेतकऱ्यांनी जमीन दिल्यास कन्नडमध्ये भव्य MIDC उभारणार – उद्योगमंत्री उदय सामंत

कन्नड तालुक्यासाठी ऐतिहासिक घोषणा; शेतकऱ्यांनी जमीन दिल्यास कन्नडमध्ये भव्य MIDC उभारणार – उद्योगमंत्री उदय सामंत

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In