प्रतिनिधी महाबळेश्वर रविंद्र संकपाळ
राज्यातील शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम बनवण्यासाठी आणि जलसंधारणाची क्षमता वाढवण्यासाठी राबविण्यात येणारे गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार ही योजना अधिक व्यापक करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी दिली सातारा जिल्ह्यातील दरेगाव येथे कोयना धरणातील गळ काढण्याचा उपक्रम उपक्रमा शुभारंभी ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालय आणि नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून धरणातील हा साचलेला गाळ काढून तो शेत जमिनीमध्ये वापरण्याचा उद्देश आहे यामुळे धरणातील पाणीसाठा क्षमता वाढवण्यास मदत होते तसेच शेतजमिनीची सुपीकता वाढून उत्पादनात भरघोस वाढ होते
यावेळी सातारा जिल्हा परिषद सदस्य श्री अजित संकपाळ महाबळेश्वर पंचायत समिती उपसभापती माननीय संजयजी मोरे जिल्हाधिकारी संतोष पाटील उपवन संरक्षण अमोल सातपुते वाईचे प्रांत अधिकारी डॉक्टर योगेश खारमाटी साताऱ्याची प्रांताधिकारी अशीच घरकुल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी सांगितले की उन्हाळ्यात धरणाची पाणी पातळी घटते त्यावेळी गाळ काढण्याची योग्य संधी असते गाळ काढल्याने धरणाची साठवण क्षमता वाढते आणि तोच गाळ शेत शेतीसाठी खतासारखा उपयुक्त ठरतो त्यामुळे जलसंधारण आणि शेती विकास या दोन्ही दृष्टीने ही योजना प्रभावी ठरत आहे
