बातमी :
चांदूर रेल्वे (प्रतिनिधी – अंकुश धामणकर) : शहरात सध्या एलपीजी गॅस तुटवड्याची भीती निर्माण झाली असून नागरिकांनी गॅस एजन्सींवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. गॅस मिळेल की नाही या चिंतेतून नागरिक सकाळपासूनच एजन्सीबाहेर रांगा लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
देशभरात जाणवत असलेल्या एलपीजी गॅस तुटवड्याचा परिणाम आता स्थानिक स्तरावरही जाणवू लागला आहे. अनेक नागरिकांनी बुकिंग करूनही सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नागरिक थेट एजन्सीकडे धाव घेत आहेत.
या परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत असून प्रशासनाने तातडीने यावर तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
