वर्धा (दि. १४ एप्रिल २०२६) | प्रतिनिधी
भारताचे संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वर्धा येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक नीरज कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस अधीक्षक यांनी महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले.
यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करत आदरांजली वाहिली. आपल्या संबोधनात पोलीस अधीक्षक म्हणाले की, “महामानवांचे विचार हे समाजाला दिशा देणारे आहेत. त्यांनी दिलेल्या समता, न्याय आणि बंधुतेच्या मूल्यांचे पालन करणे हीच खरी त्यांना अभिवादन ठरेल.”
या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.









