एरंडोल (प्रतिनिधी )
भारताचे संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त एरंडोल शहरात मंगळवारी (१४ एप्रिल २०२६) अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. भव्य मोटारसायकल रॅली, जयघोष आणि आकर्षक मिरवणुकीमुळे संपूर्ण शहर भीममय झाले.
सकाळी आमदार अमोल चिमणराव पाटील, नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, उपनगराध्यक्षा सुनिता माळी, प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार गोपाळ पाटील, मुख्याधिकारी अमोल बागुल, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर शहरातून युवकांच्या सहभागाने उत्साहपूर्ण मोटारसायकल रॅली काढण्यात आली. “जय भीम”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.
संध्याकाळी शहरातून ढोल-ताशांच्या गजरात आणि वाद्यांच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी प्रतिमेचे पूजन करण्यात आले असून युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. या मिरवणुकीदरम्यान सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडले.
माल्यार्पण कार्यक्रमावेळी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, चेअरमन जगदीश पाटील, ॲड. ओम त्रिवेदी, राजेश पाटील, बाळासाहेब पाटील, डॉ. संग्राम पाटील, डॉ. बाबा बोहरी, किशोर निंबाळकर, सतीश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लखन बनसोडे, उपाध्यक्ष प्रवीण बागुल, मयूर अहिरे, प्रविण बाविस्कर, संघरत्न गायकवाड, मोहन सैंदाणे, सुरेश सोनवणे, अनील पाटील, प्रा. भरत शिरसाठ, प्रा. संदीप कोतकर, डॉ. अतुल सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
एकूणच, एरंडोलमध्ये साजरी झालेली भीम जयंती ही उत्साह, एकता आणि सामाजिक बांधिलकीचा प्रभावी संदेश देणारी ठरली.











