प्रतिनिधी –
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘माहेर शांती निवास’ येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या निमित्ताने भारत कल्याण बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रजत पाटील यांच्या हस्ते उपस्थित नागरिकांना शीतपेय वाटप करण्यात आले. कडाक्याच्या उन्हात राबवलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शेळके साहेब आणि सेवानिवृत्त सिद्धार्थ पाटील सर उपस्थित होते. यावेळी विशालभाऊ रंगारी, आयुष धनवीज, उमंग शिंदे, पवन अहाके, विकेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देत सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचा संदेश देण्यात आला.









