पातूर (प्रतिनिधी)
पातूर तालुक्यातील चोन्ढी येथे भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती सत्यशोधक मित्र मंडळ, सावित्रीमाई फुले महिला मंडळ तसेच अखिल भारतीय मानव धम्म सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली.
जयंतीच्या पूर्वसंध्येला “छत्रपती ते घटनापती” या प्रबोधन वारीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख व्याख्याते अॅड. जयसेन सरदार यांनी इतिहासावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले.
मिरवणुकीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पूजन करून करण्यात आली. मिरवणुकीत सावित्रीबाई फुले महिला मंडळाने लेझीम पथकाचे उत्कृष्ट सादरीकरण करून कार्यक्रमाला विशेष आकर्षण दिले.
या वेळी संपूर्ण गावात शांततेचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विजय दौलत ठाकरे व त्यांच्या परिवाराने उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली.
“एक गाव, एक जयंती” या उपक्रमांतर्गत गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश खूळे सर, अजय कवडे, वैभव गणेश ठाकरे, निलेश ताजने, संतोष ताजने, सुजित ताजने, सुभाष ताजने, रोहन ताजने, समाधान भगवान ताजने, नागसेन ताजने, राजेंद्र ताजने, नितीन ताजने, बबलू ताजने व इतर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
यानंतर जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्मारकाजवळ सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. शेवटी विश्वास ताजने यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व यशस्वीरीत्या पार पडला.








