पातूर प्रतिनिधी :
पातूर तालुक्यातील नवेगाव येथे भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंतीदिनाच्या सुरुवातीला बौद्ध बांधवांनी समता व शांतीचे प्रतीक असणाऱ्या पताकांसह ध्वजारोहण करून महामानवाच्या पुतळ्याचे पूजन केले.
यानंतर ग्रामपंचायत कार्यालयातही सरपंच श्री. गजानन डाखोरे, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील तसेच इतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश करवते यांनीही प्रतिमेस अभिवादन केले.
सायंकाळी स्मारकाजवळ बौद्ध बांधवांनी एकत्र येऊन पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले. त्यानंतर सर्वांनी सामूहिकरीत्या त्रिशरण पंचशील ग्रहण केले. या ठिकाणी सामूहिक भोजनाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमास वनविभाग अधिकारी संदेश वरठे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच नितेश वरठे, आकाश ताजने, प्रदीप ताजने, अमित ताजने, सुहास ताजने, राहुल ताजने, सुभाष ताजने, देवानंद इंगोले, रमेश ताजने, अंकोश ताजने, पवन सरकटे, बलराज सरकटे, बंडू कांबळे आदींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.










