• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महामानवांचे विचार हीच काळाची गरज

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
महामानवांचे विचार हीच काळाची गरज
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
  • प्रा. डॉ. विश्वंभर गायकवाड


उदगीर (प्रतिनिधी “)महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षणाची दारे उघडली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ज्ञानाला संविधानाच्या माध्यमातून येथील बहुजनांना न्याय मिळवून दिला. या महामानवांनी पाहिलेले समतावादी प्रबुद्ध भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता तरुण पिढीची आहे. त्यासाठी आजच्या विद्यार्थांनी महापुरुषाचे मूळ साहित्य वाचले पाहिजे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध अभ्यासक प्रा. डॉ. विश्वंभर गायकवाड यांनी केले. ते वाढवणा बु. येथील यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सप्ताहाच्या प्रसंगी ते बोलत होते.*
यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्राचार्य विरभद्र बिरादार होते तर प्रमुख वक्ते म्हणून छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय उदगीर येथील प्रा. विश्वंभर गायकवाड हे उपस्थित होते. तसेच पर्यवेक्षक मनोज माने, पर्यवेक्षक जागीरदार एन. एम. प्रा. रमेश केंद्रे, प्रा. उमाकांत कांबळे, मु. अ. सुनीता फड, प्रविण भिंगोले आदीची प्रमुख उपस्थिती होती.

RelatedPosts

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन


पुढे बोलताना डॉ. गायकवाड यांनी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शिक्षण आणि आर्थिक विचारांची मांडणी केली तसेच महात्मा फुले मांडलेला सत्यशोधक विचार हाच खऱ्या अर्थाने समतावादी समाजाचा पाया आहे. या महामानवांचा विचार आजच्या पिढीने आत्मसात करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातील मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक करताना प्रवीण भिंगोले यांनी सप्ताहाच्या आयोजनाबद्दल माहिती दिली. प्रा. शफीउल्ला खान यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विरभद्र बिरादार यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत या महापुरुषांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जागीरदार एन. एम. यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. रमेश केंद्रे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. अभिजित डांगे, प्रा. रविकिरण कांबळे, अमित तिगोट, नामवाड व किशोर तोळसरवाड यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Mude Kamlakar
Previous Post

अंबाजोगाई तालुक्यात गावठी पिस्टलसह धाबा चालक जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Next Post

उदगीर येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन

Related Posts

ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026
83
ताज्या घडामोडी

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

July 19, 2026
21
ताज्या घडामोडी

गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

July 19, 2026
12
येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

July 18, 2026
66
ताज्या घडामोडी

आठ तास वीज निर्मितीच्या मागणीसाठी उर्जनग्रस्त शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा

July 18, 2026
12
ताज्या घडामोडी

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णयाची मागणी; कोल्हापूर जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे निवेदन

July 18, 2026
13
Next Post
उदगीर येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन

उदगीर येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन

ताज्या बातम्या

आळंदीकरांनो सतर्क राहा! पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच वापरा; नगरपरिषदेचे महत्त्वाचे आवाहन

July 19, 2026

इंद्रायणीच्या महापुराचा ‘श्री गोविंद महाराज केंद्र संस्थेला’ मोठा फटका; लाखो रुपयांचे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी

July 19, 2026

राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र गौरव पुरस्काराने समाजसेवक तथा युवा पत्रकार संजय चव्हाण यांचा गौरव

July 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In