• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उजनी धरणातून आठ तास वीज निर्मितीची मागणी; प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | करमाळा | प्रतिनिधी

उजनी जलाशयातून दररोज आठ तास वीज निर्मिती सुरू करण्याच्या मागणीसाठी उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत मागणी मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

RelatedPosts

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णयाची मागणी; कोल्हापूर जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे निवेदन

बिबट्याचा सामना करून दोन चिमुकल्यांचे प्राण वाचविणाऱ्या वैशाली भामरे यांचा पतसंस्थांतर्फे सन्मान

पिसेवाडीत वाघजाई देवी मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन; मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण

या निवेदनावर इद्रिस दिलावर सय्यद, अविनाश मालती सरडे, योगराज दत्तात्रय सरडे, सचिन आनंदराव पांगरे, शंकर रामचंद्र बोंडे, दादासाहेब राजाराम सरडे, रजनीन भारत राठोड, दीपचंद पवन सरडे यांच्यासह अनेक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, करमाळा तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी उजनी प्रकल्पासाठी आपल्या सुपीक जमिनी, घरे आणि इतर मालमत्ता शासनाला दिल्या. मात्र, त्याग करूनही आजही प्रकल्पग्रस्तांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

सध्या उजनी धरणात सुमारे ९५ टक्के म्हणजेच १२१ टीएमसी पाणीसाठा असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीतही वीज निर्मिती केवळ पाच तास सुरू असल्याने धरणातील पाण्याची पातळी अपेक्षित वेगाने कमी होत नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे वीज निर्मितीचा कालावधी वाढवून तो आठ तास करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने या मागणीची दखल न घेतल्यास करमाळा तालुक्यातील टोपेवाडी मंदिरासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

या निवेदनाच्या प्रती तहसीलदार करमाळा, पोलीस निरीक्षक करमाळा, महावितरणचे अधिकारी, उजनी जलाशय विभाग तसेच महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा मंत्री यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

Previous Post

ब्रह्मपुरी तालुक्यातील मूलभूत सुविधा १०० टक्के परिपूर्ण करा; पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Next Post

अतिवृष्टीचा परिणाम; ‘एसआयआर’ प्रक्रियेला १० दिवसांची मुदतवाढ, निवडणूक आयोगाचा निर्णय

Related Posts

ताज्या घडामोडी

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णयाची मागणी; कोल्हापूर जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे निवेदन

July 18, 2026
4
ताज्या घडामोडी

बिबट्याचा सामना करून दोन चिमुकल्यांचे प्राण वाचविणाऱ्या वैशाली भामरे यांचा पतसंस्थांतर्फे सन्मान

July 18, 2026
6
ताज्या घडामोडी

पिसेवाडीत वाघजाई देवी मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन; मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण

July 18, 2026
3
ताज्या घडामोडी

सोसायटी पुनर्विकासावरील मार्गदर्शनासाठी १९ जुलै रोजी ‘रिडेव्हलपमेंटच्या दिशेने’ विशेष कार्यक्रम

July 18, 2026
7
ताज्या घडामोडी

सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाला अंबाजोगाईसह राज्यभरातून पाठिंबा; पत्रकार परमेश्वर गित्ते यांचे एकदिवसीय उपोषण

July 18, 2026
1
ताज्या घडामोडी

वीर योद्धा प्रतिष्ठानकडून वारकऱ्यांना फळे व पाणी बाटल्यांचे वाटप; माऊलींच्या भक्तांची सेवाभावी परंपरा जपली

July 17, 2026
26
Next Post

अतिवृष्टीचा परिणाम; 'एसआयआर' प्रक्रियेला १० दिवसांची मुदतवाढ, निवडणूक आयोगाचा निर्णय

ताज्या बातम्या

पावसासाठी नदीतून पाणी आणून देवाचा जलाभिषेक; गडचिरोलीतील कुनघाडा (रै.) येथे अनोखी परंपरा

पावसासाठी नदीतून पाणी आणून देवाचा जलाभिषेक; गडचिरोलीतील कुनघाडा (रै.) येथे अनोखी परंपरा

July 18, 2026

FMGE परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणाऱ्या डॉ. अमेय ओल्लालवार यांचा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते सत्कार

July 18, 2026

संत साहित्य आदर्श जीवनाचा वस्तुपाठ – माधव जोशी; भिलवडी शिक्षण संकुलात डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांचा स्मृतीदिन उत्साहात

July 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In