धाराशिव, दि. :
धाराशिव येथील स्त्री रुग्णालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त रुग्णांना फळवाटप करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या समता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांना अभिवादन करत स्मरण केले.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी समाजभूषण पुरस्कार प्राप्त शंकर खूने, आरपीआय (खरात) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस (SP) चे उमेश सिरसाठे, एम. आर. शेख यांची उपस्थिती होती.
तसेच मानवी हक्क अभियान संघटनेचे तालुकाध्यक्ष जनार्दन वाळवे, मानवाधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष दादा मुळे, सुनील वाघमारे, निलेश ओव्हाळ, कैलास कांबळे, सागर सिरसाठे, प्रेम वाघमारे, मारुती राऊत यांच्यासह रुग्णालयातील परिचारिका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रुग्णांना दिलासा
मान्यवरांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. रुग्णांची विचारपूस करून त्यांना मानसिक आधार देण्यात आला. या उपक्रमातून समाजाप्रती कर्तव्यभावना आणि मानवतेचा संदेश देण्यात आला.
विचारांचा जागर
उपस्थितांनी आपल्या मनोगतातून बाबासाहेबांचे विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे सांगितले. “शिक्षण, संघटन आणि संघर्ष” या तत्वांचा अवलंब करून समाज प्रगत करावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रम शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.









