श्रीगोंदा (प्रतिनिधी) : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीबुद्रुक येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने एन.एम.एम.एस. (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) परीक्षा 2025-26 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील एकूण 83 विद्यार्थ्यांपैकी 68 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 81.92 टक्के इतका भक्कम निकाल लागला आहे. विशेष म्हणजे 38 विद्यार्थ्यांनी 100 पेक्षा जास्त गुण मिळवले असून 11 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 12 हजार रुपये याप्रमाणे पाच वर्षे शिष्यवृत्ती मिळणार आहे.
शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जगताप सोम्या संतोष, शिपणकर वैष्णवी कैलास, गायकवाड पार्थ पोपट, ढवळे सार्थक दत्तात्रय, उदमले सार्थक महेश, शेंडगे सार्थक अजय, वारे सार्थक सुनील, हिरडे यश विलास, दातीर विकास राजेंद्र, इथापे अंकुश नितीन आणि इथापे प्रांजल भारत यांचा समावेश आहे.
या यशामागे विभाग प्रमुख विलास लबडे, सहाय्यक कडाळे सर व कौटे सर, गुणवत्ता कक्ष प्रमुख ओहोळ सर, पर्यवेक्षक हरिभक्त मॅडम, उपप्राचार्य बापू दिघे तसेच प्राचार्य राजेंद्र खेडकर यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, आमदार राहुल दादा जगताप, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, तसेच शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ व ग्रामस्थांकडून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.









