श्रीगोंदा (प्रतिनिधी) : श्रीगोंदा शहरातील राजमाता विजयराज शिंदे कन्या विद्यालयाने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) परीक्षेत यंदाही उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्तेचा दबदबा कायम राखला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात विद्यालयातील 15 विद्यार्थिनी शिष्यवृत्तीधारक ठरल्या असून, त्यांच्या यशाचा सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या विद्यार्थिनींना दरवर्षी ₹12,000 प्रमाणे चार वर्षांत एकूण ₹48,000 इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे. परीक्षेस बसलेल्या 140 विद्यार्थिनींपैकी 109 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून विद्यालयाचा निकाल 78 टक्के लागला आहे. यापैकी 50 विद्यार्थिनींनी 100 पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.
या परीक्षेत कु. मयुरी लहू गांगर्डे हिने 156 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच देविकर आचल निलेश (150), सप्रे नीता नितीन (148), राऊत तनिष्का संदीप (146), वांगणे स्पंदन विजय (144), राऊत क्रांती राजेंद्र (141), टकले समीक्षा संतोष (140), कविटकर चिन्मयी संदीप (140), खोत प्राची महेश (139), शेळके संस्कृती अनिल (138), खेडकर नेहा ज्ञानदेव (137), खेंडके चिरंजीता प्रवीण (135), शिंदे सायली आबासाहेब (129), काळेवाघ आर्या राहुलकुमार (124) व कांगुणे पूर्वा अर्जुन (87) यांनीही उल्लेखनीय यश मिळवले.
या यशामागे विभाग प्रमुख मिलिंद काळे तसेच विषय शिक्षक कुंदन खामकर, सोनाली कळसकर व ज्ञानदेव पोळ यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थिनींचे मुख्याध्यापिका वर्षा भोईटे, पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे व गुरुकुल प्रमुख किरण शिंदे यांनी अभिनंदन केले.
गेल्या अनेक वर्षांप्रमाणे यंदाही रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागात अग्रस्थानी राहण्याची परंपरा विद्यालयाने कायम राखली असून, या यशामुळे परिसरात विद्यार्थिनींचे कौतुक होत आहे.








