• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एरंडोलमध्ये उष्माघाताचा संशय; ६० वर्षीय महिलेचा मृत्यू, परिसरात हळहळ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in Blog
0
एरंडोलमध्ये उष्माघाताचा संशय; ६० वर्षीय महिलेचा मृत्यू, परिसरात हळहळ
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

एरंडोल (प्रतिनिधी – तुषार शिंपी) : राज्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे उष्माघाताचा संशय असलेल्या घटनेत ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सखुबाई अशोक देशमुख असे मृत महिलेचे नाव असून त्या शेतमजूर म्हणून काम करत होत्या. एरंडोल तालुक्यातील उष्माघाताचा हा पहिलाच बळी असल्याची चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख मढी परिसरातील रहिवासी सखुबाई देशमुख या शुक्रवारी (दि. २४ एप्रिल) इतर महिला मजुरांसोबत महेंद्र महाजन यांच्या शेतात निंदणीच्या कामासाठी गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास काम करत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तत्काळ सावलीत नेऊन प्राथमिक मदत देण्यात आली व पुढे डॉ. सुयश पाटील यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात तपासणीपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

RelatedPosts

हरकुळखुर्द येथे संजय गांधी योजना लाभार्थींसाठी मोफत उत्पन्न दाखला शिबिर; ११० लाभार्थ्यांना दिलासा

पर्यावरण व जलसंवर्धनासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती; रिठद व आसेगावमध्ये विद्यार्थ्यांची रॅली

नायगाव येथील बी.एड महाविद्यालयात शिक्षकांचा कृतज्ञता सत्कार समारंभ उत्साहात

गेल्या काही दिवसांपासून एरंडोल परिसरातील तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उष्णतेचा प्रचंड तडाखा जाणवत आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी हा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा दावा केला असला तरी एरंडोल ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील यांनी अद्याप अधिकृत वैद्यकीय अहवाल प्राप्त झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सखुबाई देशमुख यांचे कुटुंब अत्यंत गरीब असून शेतमजुरीवरच त्यांचा उदरनिर्वाह होता. त्यांच्या पश्चात पती व दोन मुले असा परिवार आहे. शनिवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वाढत्या उष्णतेत नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

कडेगावमध्ये प्रामाणिकपणाचे उदाहरण; सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने ₹२.१२ लाखांची रक्कम परत केली

Next Post

कांदिवलीत १४वा सामूहिक विवाह सोहळा संपन्न; १५ जोडप्यांचे लग्न, सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय

Related Posts

हरकुळखुर्द येथे संजय गांधी योजना लाभार्थींसाठी मोफत उत्पन्न दाखला शिबिर; ११० लाभार्थ्यांना दिलासा
Blog

हरकुळखुर्द येथे संजय गांधी योजना लाभार्थींसाठी मोफत उत्पन्न दाखला शिबिर; ११० लाभार्थ्यांना दिलासा

April 26, 2026
0
पर्यावरण व जलसंवर्धनासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती; रिठद व आसेगावमध्ये विद्यार्थ्यांची रॅली
Blog

पर्यावरण व जलसंवर्धनासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती; रिठद व आसेगावमध्ये विद्यार्थ्यांची रॅली

April 26, 2026
3
नायगाव येथील बी.एड महाविद्यालयात शिक्षकांचा कृतज्ञता सत्कार समारंभ उत्साहात
Blog

नायगाव येथील बी.एड महाविद्यालयात शिक्षकांचा कृतज्ञता सत्कार समारंभ उत्साहात

April 26, 2026
14
भक्तीमय वातावरणात सद्गुरू श्री शंकर महाराज यांचा ७९ वा समाधी उत्सव सोहळा संपन्न
Blog

भक्तीमय वातावरणात सद्गुरू श्री शंकर महाराज यांचा ७९ वा समाधी उत्सव सोहळा संपन्न

April 26, 2026
20
जागतिक हिवताप दिनानिमित्त बेल्हे येथे जनजागृती रॅली
Blog

जागतिक हिवताप दिनानिमित्त बेल्हे येथे जनजागृती रॅली

April 26, 2026
11
Blog

कृतज्ञता सोहळा व विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन

April 26, 2026
1
Next Post
कांदिवलीत १४वा सामूहिक विवाह सोहळा संपन्न; १५ जोडप्यांचे लग्न, सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय

कांदिवलीत १४वा सामूहिक विवाह सोहळा संपन्न; १५ जोडप्यांचे लग्न, सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय

ताज्या बातम्या

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा चौंडीहून भव्य शुभारंभ

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा चौंडीहून भव्य शुभारंभ

April 26, 2026

दरेगावात विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त, नियमित पुरवठ्याची मागणी

April 26, 2026
हरकुळखुर्द येथे संजय गांधी योजना लाभार्थींसाठी मोफत उत्पन्न दाखला शिबिर; ११० लाभार्थ्यांना दिलासा

हरकुळखुर्द येथे संजय गांधी योजना लाभार्थींसाठी मोफत उत्पन्न दाखला शिबिर; ११० लाभार्थ्यांना दिलासा

April 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In