रिठद (प्रतिनिधी) : जिजाऊ इंग्लिश स्कूल रिठदच्या वतीने ग्राम रिठद व आसेगाव येथे स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि जलसंवर्धन या विषयांवर जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी पथनाट्य आणि घोषणांच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण केली.
रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी “जल है तो जीवन है”, “स्वच्छ शहर सुंदर शहर” यांसारख्या प्रभावी घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. तसेच धार्मिक पथनाट्य सादर करून पाणी बचतीचे महत्त्व आणि पर्यावरण संरक्षणाची गरज प्रभावीपणे मांडली. या सादरीकरणामुळे ग्रामस्थांचे विशेष लक्ष वेधले गेले.
या कार्यक्रमास शाळेचे सचिव सुभाषराव बोरकर, प्राचार्य संदीप खडसे तसेच सीबीएसई शाळेचे प्रशिक्षक संदीप देवरे आणि शहरातील मान्यवर उपस्थित होते. रॅलीला हरि झेडी आसेगावचे उपसरपंच कैलास खानझोडे यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत शाळेच्या या सामाजिक उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमात शिक्षक भागवत सरनाईक, प्रांजली सरनाईक, पुष्पलता आरु, गोपाल काळे, संदीप राऊत, भूषण भोसले, असिफ शेख, ज्योती काकडे, अंजली मिटकरी, संदीप बोरकर, वृषाली राऊत, श्वेता वटटमवार, शारदा सोळंके, रिता पांडे, अमरदीप नारंग, रुपाली पंडित, ज्योती देव्हडे, सारिका लाहोरे, कोमल बोराळकर, जगन इंगोले, मंगल गवई, मीना अंभोरे, दुर्गा भगत, सविता चंदुस्कर, दिपक जाधव, संतोष पुरी यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत सकारात्मक संदेश पोहोचला असून गावात जनजागृती निर्माण झाली आहे.









