रांजणोली : प्रतिनिधी
रांजणोली गावातील कु. श्रेया अविनाश भगवान पाटील हिने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एस.एस.सी. परीक्षा २०२६ मध्ये कोणतेही कोचिंग क्लासेस न लावता ६४.२० टक्के गुण संपादन करून उल्लेखनीय यश मिळवले आहे.
स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर आणि नियमित अभ्यासाच्या बळावर श्रेयाने हे यश संपादन केले असून, तिच्या या यशाबद्दल गावातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या यशामुळे रांजणोली गावाचे नाव उज्ज्वल झाले आहे.
कु. श्रेया हिचे पालक, शिक्षक तसेच नातेवाईकांनी तिचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.






