• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जाळीचा देव : प्रभूच्या पदस्पर्शाने ओसाड डोंगराचे झाले दिव्य तीर्थक्षेत्र — स्मरण, साधना आणि जीवोद्धाराचा अखंड जागर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 10, 2026
in Blog
0
जाळीचा देव : प्रभूच्या पदस्पर्शाने ओसाड डोंगराचे झाले दिव्य तीर्थक्षेत्र — स्मरण, साधना आणि जीवोद्धाराचा अखंड जागर
0
SHARES
40
VIEWS
Ad 1

“अवघे विशेष ते डोमेग्राम येथे आहे…”

प्रतिनिधी | जाळीचा देव, भोकरधन परिसर

RelatedPosts

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

महानुभाव पंथाच्या इतिहासात काही स्थाने ही केवळ भौगोलिक जागा नसतात; ती प्रभूंच्या लीलांची, साधुसंतांच्या तपश्चर्येची आणि असंख्य जीवांच्या श्रद्धेची जिवंत साक्ष असतात. असेच एक तेजस्वी, दिव्य आणि भावस्पर्शी स्थान म्हणजे — जाळीचा देव.

आज हे स्थान फक्त डोंगरमाथ्यावर वसलेले मंदिर नाही, तर असंख्य जीवांच्या श्रद्धेचे, समाधानाचे, स्मरणाचे आणि अध्यात्मिक उन्नतीचे केंद्र बनले आहे.

खरंच… काही माणसं… काही स्थळं… सुरुवातीला अगदी साधी, लहान किंवा नगण्य वाटतात; मात्र आपल्या दिव्य कर्तृत्वाने ती संपूर्ण जगाची ओळख बनून जातात. जाळीचा देव हे त्याचेच जिवंत उदाहरण आहे.

महानुभाव पंथीयांच्या मुखातून “डोमेग्राम” हे नाव उच्चारले की सहज स्मरणात येते ते अमृतवचन —

“कोणत्या ठिकाणी काय विशेष,
तर कोणत्या ठिकाणी काय विशेष,
अवघे विशेष ते डोमेग्राम येथे आहे…”

हे केवळ वचन नाही; तर त्या भूमीच्या आध्यात्मिक महिमेचा अनुभव आहे.

प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी

सुमारे साडेआठशे वर्षांपूर्वीचा तो काळ… ना सुखसोयी, ना वाहने, ना रस्ते… साधनदाता सर्वज्ञ प्रभू श्रीचक्रधर महाराज जीवोद्धारासाठी अखंड पायी भ्रमंती करीत होते.

सावळदरबार येथे वीस दिवस वास्तव करून प्रभू पुढे कनवेच्या जीवांच्या उद्धारासाठी निघाले. समोर होता करवंदाच्या झाडांनी व्यापलेला डोंगराळ, निर्जन आणि ओसाड प्रदेश.

जिथे जनावरांनाही सहज वावरता येत नव्हता, तिथे प्रभूंनी आपल्या श्रीचरणांचा स्पर्श केला आणि त्या मातीचेच देवत्वात रूपांतर झाले.

डोंगर चढताना शरीर दमते, श्वास भरतो, मन अस्वस्थ होते. अशावेळी एखादी शांत जागा मिळाली की जीवाला निवांतपणा लाभतो. प्रभूंनी त्या डोंगरमाथ्यावर काही क्षण विश्रांती घेतली. ती विश्रांती देहाची नव्हती; तर भविष्यात दुःखी, व्याकुळ आणि संसाराने थकलेल्या जीवांना शांततेचा आधार देणाऱ्या स्थळाची स्थापना होती.

महानुभाव पंथाची शिकवण सांगते —

“जीव उद्धरावा, त्यासी मार्ग दावावा.”

मनाला शांत करणारे प्रभूंचे स्मरणस्थळ

आजही जाळीचा देव येथे येणारा भक्त रिकाम्या हाताने परत जात नाही. तो काही ना काही अंतरिक समाधान घेऊनच परततो.

कोणी नामधारक… कोणी उपदेशी… कोणी वासनिक… कोणी दीक्षित साधक… कोणी संन्यासी… तर कोणी प्रभूभेटीच्या ओढीने आलेला अस्तपरीचा साधक…

परंतु येथे आल्यावर प्रत्येकाच्या मनात एकच अनुभूती जागृत होते — शांततेची.

जसे आईच्या कुशीत विसावल्यावर लेकराचे दुःख विरघळते, तसेच या प्रभूपदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आल्यावर भक्ताचे अंतःकरण प्रसन्न होते.

रडणारा जीव हसतो… थकलेले मन शांत होते… आणि अस्वस्थ आत्म्याला पुन्हा नवी ऊर्जा मिळते.

सर्वज्ञ प्रभू म्हणतात —

“स्मरणे जीव उद्धरती.”

ओसाड डोंगराचे झाले नंदनवन

एकेकाळी निर्जन आणि काटेरी झाडांनी व्यापलेला हा डोंगर आज साधना, तपश्चर्या आणि भक्तीने बहरून गेला आहे.

जिथे कधी मानववस्ती होईल असे वाटत नव्हते, तिथे आज शेकडो आश्रम उभे आहेत. जिथे काटेरी करवंदाची झाडी होती, तिथे आज हरिनामाचा मंगल नाद घुमतो. जिथे एकाकीपणा होता, तिथे आज प्रभुस्मरणाचा सुगंध दरवळतो.

ही परिवर्तनाची शक्ती कोणती? तर ती आहे — प्रभूंच्या चरणस्पर्शाची आणि साधुसंतांच्या तपश्चर्येची.

मंदिर उभारणीचा प्रेरणादायी इतिहास

या पवित्र स्थळाची मंदिर उभारणी सुमारे १९३४ साली श्रद्धेय नामदेवराव पाटील यांच्या माध्यमातून झाली. सुरुवातीला छोटासा ओटा बांधून पूजन सुरू झाले. नंतर लहानसे मंदिर उभारण्यात आले.

मात्र या स्थानाच्या वैभवाचा खरा प्रारंभ झाला तो कवीश्वर कुळाचार्य श्रद्धेय आचार्य कै. श्रीखामनिकर बाबा महानुभाव यांच्या प्रयत्नातून.

सन १९६४ मध्ये त्यांनी येथे छोटासा आश्रम उभारला. मंदिराची सेवा, देखभाल आणि विकासाची जबाबदारी स्वतःवर घेतली.

लोकवर्गणीतून मंदिराचा विस्तार झाला आणि आज त्या छोट्याशा ओट्याचे रूपांतर भव्य दिव्य मंदिरात झाले आहे.

जाळीचा देव महात्म्य : लोकश्रद्धेत जपलेली प्रभूलीला

जाळीचा देव या पवित्र स्थानाच्या महात्म्याबाबत महानुभाव पंथात विविध मतप्रवाह आणि लोकश्रद्धा प्रचलित आहेत.

एक मत असे सांगते की, साधनदाता सर्वज्ञ प्रभू श्रीचक्रधर महाराज हे पूर्वार्ध काळात येथे आले होते आणि त्यांनी या डोंगरमाथ्यावर काही काळ विश्रांती घेतली. त्या प्रभूपदस्पर्शानेच ही भूमी पावन झाली आणि पुढे हे स्थान “जाळीचा देव” म्हणून प्रसिद्ध झाले.

मात्र दुसरा मतप्रवाह वेगळ्या प्रकारे या स्थानाचे महात्म्य सांगतो.

या मतानुसार, शेंदुर्जन प्रांतात प्रभूंचे एकांक काळात जवळपास बारा वर्षांचे वास्तव्य असताना, त्यांनी अनेक वेळा आसपासच्या डोंगराळ आणि जंगल परिसरात भ्रमण केले होते.

लोकश्रद्धेनुसार, त्या वेळी या डोंगर परिसरात एका वाघिणीने पिल्लांना जन्म दिला होता. प्रभूंना पाहून ती लहान पिल्ले त्यांच्या जवळ आली. प्रभूंनी त्यांना आपल्या मांडीवर घेऊन प्रेमाने कुरवाळले.

इतक्यात ती वाघीण आपल्या पिल्लांकडे धावत आली; मात्र प्रभूंच्या तेजस्वी आणि करुणामय दृष्टीशी तिची नजर जुळताच ती शांत झाली.

या प्रसंगाला काही ठिकाणी “व्याघ्रभेट” असा उल्लेख केला जातो.

अर्थात, या कथनांना ठोस ऐतिहासिक प्रमाण उपलब्ध आहे असे म्हणणे कठीण आहे; परंतु पिढ्यानपिढ्या साधक, वासनिक आणि स्थानिकांच्या मुखातून ऐकिव स्वरूपात या कथा सांगितल्या जातात.

११ व १२ मे रोजी “पदस्पर्श पावन दिन”

दिनांक ११ व १२ मे २०२६ रोजी जाळीचा देव येथे प्रथमच “पदस्पर्श पावन दिन” मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

ज्या दिवशी प्रभूंनी या भूमीवर श्रीचरण ठेवले, त्या दिवसाच्या स्मरणार्थ हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

ही संकल्पना पूजनीय आचार्य श्री चिचोंडीकर बाबा यांच्या मनात उदयास आली.

त्यांनी या कार्यक्रमाला मर्यादित स्वरूप न देता संपूर्ण पंथातील साधुसंत, महंत, भिक्षुक, तपस्विनी माता, भगिनी आणि वासनिक यांना आमंत्रित केले आहे.

संपूर्ण भारतातून हजारो पंथीय या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असून, प्रभूंच्या शिकवणीवर आधारित प्रवचने, नामस्मरण, धर्मचर्चा आणि अध्यात्मिक मार्गदर्शन होणार आहे.

महानुभाव आश्रमाचा सुवर्णमहोत्सव

याच मंगल प्रसंगी जाळीचा देव परिसरातील महानुभाव आश्रम आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.

सन १९७६ मध्ये गवताच्या कुडाच्या स्वरूपात सुरू झालेला हा आश्रम पुढे पत्र्याच्या वास्तूत आणि नंतर आधुनिक इमारतीत विकसित झाला.

ज्या आश्रमात सुरुवातीला केवळ पाच साधक धर्मकार्य करीत होते, त्याच आश्रमातील साधक संख्या आज पंचावन्नवर पोहोचली आहे. ही प्रभूकार्याच्या उर्ध्वगतीची साक्ष मानली जात आहे.

आज या आश्रमाचे संचालन पूजनीय आचार्य श्री चिचोंडीकर बाबा महानुभाव यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

समारोप

जाळीचा देव हे केवळ मंदिर नाही; तर तो महानुभाव पंथाच्या स्मरणमार्गाचा जिवंत दीपस्तंभ आहे.

आजच्या धावपळीच्या, तणावग्रस्त आणि स्वार्थी युगात खरी शांती ही प्रभूच्या स्मरणात, साधनेत आणि सत्यमार्गात आहे, हे जाळीचा देव पुन्हा पुन्हा शिकवतो.

जाळीचा देव येथे आयोजित करण्यात आलेला “पदस्पर्श पावन दिन” तसेच महानुभाव आश्रमाचा सुवर्ण महोत्सवी सोहळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, तो प्रभूभक्ती, स्मरण, साधना आणि समाजप्रबोधनाचा एक दिव्य उत्सव ठरो, हीच प्रभू चरणी प्रार्थना व्यक्त होत आहे.

✍️ लेखक :

सुरेश सरूबाई देवराम डोळसे, नाशिक
नि. सदस्य — अखिल भारतीय महानुभाव परिषद
संस्थापक अध्यक्ष — श्रीप्रभू प्रतिष्ठान, नाशिक

📞 मो. नं. : ९४२२७६२९१४

Previous Post

हायटेक इंग्लिश स्कूल येणेगूरचा एस.एस.सी. परीक्षेत १०० टक्के निकाल

Next Post

आजरा तालुक्याचा दहावीचा निकाल ९८.२८ टक्के; २२ शाळांची शंभर टक्के यशाची परंपरा कायम

Related Posts

Blog

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026
44
Blog

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026
33
Blog

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026
8
Blog

धैर्यशील कदम यांनी विधान परिषद सदस्य म्हणून घेतली शपथ

June 26, 2026
6
Blog

वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी रेखाताई माळी यांची बिनविरोध निवड; सत्कार समारंभ उत्साहात

June 26, 2026
39
Blog

खासदार संजय पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

June 26, 2026
20
Next Post
आजरा तालुक्याचा दहावीचा निकाल ९८.२८ टक्के; २२ शाळांची शंभर टक्के यशाची परंपरा कायम

आजरा तालुक्याचा दहावीचा निकाल ९८.२८ टक्के; २२ शाळांची शंभर टक्के यशाची परंपरा कायम

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In