चांदुर रेल्वे प्रतिनिधी :
चांदुर रेल्वे शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येबाबत शहर युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.
शहरातील नागरिकांना सततच्या वीज खंडित समस्येमुळे मोठा त्रास सहन करावा लागत असून, तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. माजी आमदार वीरेंद्र भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष शिट्टू दादा सूर्यवंशी, शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष निवास भाऊ सूर्यवंशी, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष रुपेश पुळके, स्वप्निल मानकर, सारंग देशमुख, सागर गरुड, अजय देसाई, अर्जुन सरदार, तेजस वानखडे, आर्यन वनवे तसेच काँग्रेस कमिटीचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरातील वीज पुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.










