आढीव प्रतिनिधी :
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त आढीव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. आढीव येथील दहावी, बारावी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी आढीव गावातील पहिली एमबीबीएस पदवीधर विद्या मंगल महादेव जगदाळे हिचा डॉक्टर पदवी प्राप्त केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
दहावी बोर्ड परीक्षेत कु. समीक्षा शाहू चव्हाण हिने ९२.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. सानिका भारत जगदाळे हिने ८९.४० टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. राजनंदनी उत्तम सुरवसे हिने तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले. या सर्व विद्यार्थिनी भैरवनाथ विद्यालय, आढीव येथील आहेत.

बारावी परीक्षेत कु. मयुरी युवराज चव्हाण हिने ७१ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. सृष्टी लक्ष्मण सरवदे हिने ६९.६७ टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. सलोनी समाधान दंदाडे हिने ६७.३३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.
तसेच कु. श्रुती सज्जन पुरी हिने एनटी-ब प्रवर्गातून एनएमएमएस परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून गावाचा गौरव वाढवला.
हा सत्कार समारंभ आढीव येथील संभाजी ब्रिगेड कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रोंगे मॅडम, दिनकर दाजी चव्हाण, सोमनाथ गोरे, भाऊ थोरात, शंकर महाराज चव्हाण, सोमनाथ घोगरे, हरिदास नवले, तानाजी चव्हाण, गुरु पाटोळे, सोमनाथ चव्हाण, मेजर एकनाथ चव्हाण, सत्यवान थोरात, सुभाष खाडे, संजय चव्हाण, वामन आण्णा चव्हाण, महेश चव्हाण, महादेव पवार, धनाजी वसेकर, रमेश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.



