हदगाव | प्रतिनिधी
दि. २१ मे २०२६ रोजी गुरुवारी निवघा (बाजार), ता. हदगाव, जि. नांदेड येथे गोपाळ समाजाच्या वतीने सन २०२५-२६ च्या एस.एस.सी. शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा भव्य सत्कार सोहळा श्रीकृष्ण मंदिर येथे उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त आगारप्रमुख तुकाराम गव्हाणे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार गजानन नरवाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष तुकाराम गव्हाणे यांनी केले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये कु. माधुरी रामकृष्ण कालापाड हिने ९५ टक्के गुण मिळवत निवघा येथून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कु. देवयानी बालाजी धनगर (९१%), कु. सुप्रिया गजानन तपासे (८८%), कु. सानिका गंगाराम मोरे (८६%), कु. गायत्री बालाजी गव्हाणे (८५%), कु. वर्षा शिवाजी गायकवाड (७९%), कु. धनश्री गजानन नरवाडे (६८%), कु. गौरी अमोल हटकर (५६%) यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
तसेच गोपाळ समाजातील विद्यार्थी रोशन बालाजी नरवाडे (८८%), कृष्णा बालाजी मोरे (७८%), गौरव बाबुराव मोरे (७६%), वैभव नारायण मोरे (६८%), ओंकार शिवाजी वाघमारे (६६%), ओमकार दिलीप महाजन (६२%), श्याम दिलीप गव्हाणे (६१%), गोविंद फकीरा धनगर (६१%) तसेच ओम बंडू महाजन यांनीही परीक्षेत यश संपादन करून समाजाचे नाव उज्ज्वल केले.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा. संतोष गव्हाणे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात अधिक मेहनत घेऊन विविध क्षेत्रात प्रगती करण्याचे आवाहन केले. “आई-वडिलांचे तसेच समाजाचे नाव उज्ज्वल करा. भविष्यात शैक्षणिक अडचण आल्यास मी नेहमी सहकार्य करीन,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमास गणेश गव्हाणे, संतोष वाघमारे, संभाजी गव्हाणे, बाबुराव नवघरे, शिवाजी धोंगडे, सुभाष महाजन, पत्रकार देवानंद महाजन, पत्रकार अशोक गव्हाणे, पत्रकार गजानन कदम यांच्यासह गोपाळ समाजातील ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
शेवटी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.










