लातूर | प्रतिनिधी
लायन्स क्लब ऑफ लातूर सिटी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “सन्मान कर्तृत्वाचा” राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि ‘काव्यरंग’ कवी संमेलन दयानंद सांस्कृतिक सभागृह येथे मोठ्या उत्साहात व रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागनाथ गित्ते हे होते, तर उद्घाटक म्हणून डॉ. भारत बास्टेवाड उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून अमोल तांबे यांची उपस्थिती लाभली. तसेच विलास बडे यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची माहिती संयोजक अनिल पुरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
यावेळी समाजात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिशा प्रतिष्ठान, समर्पण फाउंडेशन, आदर्श मैत्री फाउंडेशन, ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन, तुकाराम पाटील मित्र मंडळ आणि बालरंगभूमी परिषद या संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
तसेच पत्रकार शशिकांत पाटील, आसावरी बोधनकर-जोशी, सुशील सूर्यवंशी, महेश हेड्डा, बालाजी जगताप, अण्णाराव खोडेवाड, संजय राजुळे तसेच नागपूर येथील दिपाली आणि अंजली राठोड यांना “सन्मान कर्तृत्वाचा” या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमात डॉ. भारत बास्टेवाड, अमोल तांबे आणि विलास बडे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
कवी संमेलनात महाराष्ट्रातील नामवंत कवी नारायण पुरी, रविंद्र केसकर, निलेश चव्हाण, गुंजन पाटील आणि अविनाश भारती यांनी आपल्या कवितांचे सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली. कवी संमेलनामुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागनाथ गित्ते यांनी केले. सूत्रसंचालन अनिल पुरी यांनी केले, तर आभार अॅड. योगेश शिंदे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ईश्वरप्रसाद चांडक, राजेश मित्तल, जगदीश हेड्डा, अनिल झंवर, संजय राजुळे, राधेश्याम धूत, प्रशांत रेड्डी, सचिन चेवले, व्यंकट ठणके, सुहास पाचेगावकर, बसवराज मंगरुळे, लक्ष्मीकांत कालिया, मनोज देशमुख आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला लातूरकरांचा मोठा प्रतिसाद लाभला.









