Maharashtra राज्य महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये “राज्यमाता गोमाता संवाद यात्रा” आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचे ८ जून रोजी Buldhana जिल्ह्यात आगमन होणार असून, त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष नियोजन बैठक पार पडली.
जिल्ह्याच्या सीमेवरील Deulgaon Raja येथे यात्रेचे स्वागत करण्यात येणार असून, त्यानंतर Chikhli येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गोप्रेमी, गोशाळा संचालक, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली.
या यात्रेचे नेतृत्व शेखर मुंदडा करणार असून, त्यांच्यासमवेत उद्धव दिवाकर नेरकर, सुनील सूर्यवंशी, सनत गुप्ता, परेश शाह आणि संजय भोसले सहभागी होणार आहेत.
२२ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे अध्यक्षस्थानी होते. यावेळी आयोगाचे सदस्य सचिव डॉ. श्यामकांत पाटील, उपायुक्त पशुसंवर्धन दुग्धविकास डॉ. अमित कुमार दुबे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत यात्रेच्या मार्गाचे नियोजन, स्वागत व्यवस्था, सुरक्षा, जनजागृती कार्यक्रम आणि गोशाळा प्रतिनिधींशी संवाद याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याची ग्वाही दिली.
यात्रेचा उद्देश
“राज्यमाता गोमाता संवाद यात्रा” ही राज्यभर सुमारे ६००० किलोमीटर प्रवास करणार असून, जवळपास १००० गोशाळा, १५ हजार गोरक्षक, गोपालक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे.
या यात्रेच्या माध्यमातून:
- देशी गोवंशाचे धार्मिक, सामाजिक, आर्थिक आणि वैज्ञानिक महत्त्व पटवून देणे
- गोआधारित शेती आणि गोमय उत्पादनांबाबत जनजागृती करणे
- गोशाळांना स्वावलंबी बनविण्याचे मार्गदर्शन
- पशुसंवर्धन विभाग व गोसेवा आयोगाच्या योजनांची माहिती देणे
- संपूर्ण गोवंश हत्या बंदी कायद्याबाबत जागृती करणे
असे विविध उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत.
या यात्रेचा शुभारंभ ३१ मे रोजी Pune येथे पशुपालन मंत्री पंकजा मुंडे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.











