धारूर :
किल्ले धारूर शहरात आर्य वैश्य श्रीकृष्ण सखी यांच्या वतीने श्री पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्री भागवत कथा यज्ञ महापुराण सोहळ्याला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दि. २१ मे २०२६ पासून सुरू झालेल्या या भागवत कथा महापुराणाचे निरूपण श्री श्री श्री हरिहरानंद भारती स्वामी महाराज यांच्या अमृतवाणीतून होत असून धारूरकर भाविक मोठ्या श्रद्धेने कथाश्रवणाचा लाभ घेत आहेत.
तसेच दि. २८ मे २०२६ रोजी गुरुवारी सकाळी १० वाजता काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले असून, ह.भ.प. शतनू महाराज पाठक वालुरकर यांच्या अमृतवाणीतून कीर्तन सेवा होणार आहे. त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आर्य वैश्य श्रीकृष्ण सखी भावठणकर, डुबे, पिलाजी, रूद्रवार, चिद्रवार, शेटे आदी आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.









