पाथरी तालुक्यातील रामपुरी येथे गोदावरी नदी सहीत बंधारा उषाला आणि कोरड मात्र घषाला
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी
पाथरी तालुक्यातील मौजे रामपुरी खु.येथे गोदावरी नदी सहीत त्या वरिल बंधारा उषाला आणि कोरड मात्र घषाला आसी स्थीती निर्मान झाली आहे कारण गेल्या तीन महीण्या पासुन गावातील नळाला पाणीच आले नसल्याचा आरोप करत शेकडो महिलांचा पाथरी येथील पंचायत समीती सभाग्राहात ठिय्या आंदोलन केले या दरम्यान उपस्थीत आंदोलक महीलांच्या प्रश्नांना उत्तर देता देता पंचायत समीती प्रशासनाच्या नाकीनऊ
सविस्तर वृत्त आसे कि पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथे शासनाच्या वतीने गोदावरी नदी वर उच्चपातळी बंधारा बांधला आहे या बंधार्या मुळे पाथरी शहरा बरोबरच प्रभावीत क्षेत्रातील नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही सुटला आहे एवढेच काय तर शेकडो हेक्कर शेतीसाठीच्या सींचनाचा प्रश्न हि मार्गी लागला आहे
ढालेगाव बंधारा जरी ढालेगाव येथे आसला तरी पाणीसाठवण क्षेत्र हे ढालेगाव,रामपुरी सहीत आनेक गावाला आहे
या मुळे या गावास मुबलक पाणी आहे
परंतु योग्य नियोजन न करण्यात आल्या मुळे गेल्या तीन महिण्या पासुन रामपुरी खु.या गावातील नळाला पाणीच आले नाही तर गावातील हात पंम्प ही बरेच, ना दुरुस्त आहेत या मुळे गावातील नागरीकांना पीण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळे आली आहे आसा आरोप करत रामपुरी गावातील शेकडो महिलांनी पाथरी पंचायत समिती सभाग्राहात दि.२७/०५/२०२६ रोजी ठिय्या आंदोलन सुरु केले होते
याची माहीती गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना मिळताच सर्व कामे बाजुला ठेवुन सभाग्रहा कडे धाव घेतली आसता उपस्थीत महिला आंदोलक यांनी प्रश्नांचा भडीमार सुरु केला या महीलांच्या प्रश्नांना उत्तर देतांना पंचायत समिती प्रशासनाच्या नाकीनऊ आल्याचे तीत्र निर्मान झाले होते शेवटी गटविकास अधिकारी यांनी सावध भुमिका घेत लवकरच आपनास पाणी मिळेल आसे आस्वासन दिले आसता महिलांनी आपल्या प्रश्नांच्या तोफा शांत करत आंदोलन मागे घेतले
…………………चौकट…………..
या आंदोलना दरम्यान गावातील जलजीवण मिशनचे कामे अतीशय निकृष्ट दर्जाचे झाले आसुन योजनेतील पाईप लाईन अतीषय वरच्या बाजुलाच आसल्या मुळे बैलगाडीच्या चाकाणे ही फुटत आहेत या मुळे गावातील पाणी पुर्वठा गेल्या तीन महिण्या पासुन बंद पडत आहे या सहीत आनेक प्रश्नांचा पाऊस पंचायत समितीचे गटवीकास अधिकारी यांच्या वर ग्रामस्तांनी केले आता रामपुरी येथील जलजीवन मिशन च्या कामा बाबद संबधीत प्रशासन चौकसी करेल का?हाच खरा कळीचा मुद्दा आहे











