नाशिक | प्रतिनिधी अमर पठारे
गोवंश तस्करी, अवैध वाहतूक आणि कायदा मोडणाऱ्या प्रवृत्तींविरोधात नाशिक ग्रामीण पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळविले आहे. या मोहिमेदरम्यान १५५ गुन्हे दाखल करण्यात आले असून २५७ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच ९०६ गोवंश जनावरे सुरक्षित करण्यात आली असून ११० वाहने जप्त करण्यात आली आहेत.
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. गोवंश जनावरांची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करत पोलिसांनी जनावरांचे प्राण व संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत.
या उल्लेखनीय कारवाईबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत पोलीस प्रशासनाचे आमदार प्रा. सौ. देवयानी फरांदे यांनी कौतुक केले आहे. तसेच नाशिक ग्रामीण पोलीस दल, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
गोवंश तस्करी, अवैध वाहतूक व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भविष्यातही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहतील, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
कारवाईचा तपशील :
- दाखल गुन्हे – १५५
- आरोपींवर कारवाई –२५७
- सुरक्षित करण्यात आलेली गोवंश जनावरे – ९०६
- जप्त वाहने – ११०–










