प्रतिनिधी विशाल लाखे
उरुण–ईश्वरपूर येथे “लोकसंवादातून विकास – चला करूया नागरी समस्यांचे उच्चाटन” या उपक्रमांतर्गत प्रभाग क्रमांक ७ मधील हनुमान नगर येथे नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मा. आ. जयंतरावजी पाटील साहेब आणि प्रतीक दादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि नगर परिषद उरुण–ईश्वरपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे दादा, उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव नाना यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला.
या कार्यक्रमात अनेक नागरिकांनी आपापल्या अडचणी मांडल्या. यावेळी पत्रकार विशाल लाखे यांनी अत्यंत महत्त्वाचा आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला. एक अत्यंत गरीब कुटुंब
लक्ष्मीबाई भीमराव साळवी या वृद्ध महिलेला अनेक वर्षांपासून मोतिबिंदू आणि काचबिंदूचा त्रास होत होता. त्या व त्यांचे पती भीमराव साळवी हे अत्यंत गरीब व निराधार असून भाड्याच्या घरात राहतात. कोणतेही आवश्यक कागदपत्र नसल्यामुळे त्यांच्या डोळ्याच्या ऑपरेशनला अनेक वर्षे विलंब होत होता. अनेक वर्ष ते अंध म्हणुन राहत होते. कोणतेही कागदपत्र नसल्यामुळे त्यांना डावललं जात होत.
हा प्रश्न गांभीर्याने घेत
ऑपरेशन जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान मार्फत श्रीमती कुसुमताई राजाराम बापू पाटील आरोग्य ओपीडी केंद्र मार्फत कृष्णा हॉस्पिटल कराड येथे करण्यात करण्यात आले. त्यामुळे या वृद्ध दाम्पत्याला मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या जीवनात नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे..
ऑपरेशन झाल्यामुळे लक्ष्मीबाई यांना केवळ दृष्टीच नाही तर जगण्याचा नवा आधार मिळाला आहे. अनेक वर्षांपासून अंधारात जगणाऱ्या या गरीब दाम्पत्याच्या आयुष्यात आता पुन्हा प्रकाश आला आहे. कोणताही आधार नसताना त्यांना मिळालेली ही मदत त्यांच्या आयुष्यासाठी खूप मोठी ठरली. अशा वेळी मिळालेला हात हा केवळ उपचार नसून माणुसकीचा खरा आधार असल्याची भावना निर्माण झाली.
या उपक्रमावेळी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे दादा, उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव नाना, पक्षप्रतोद आरुणादेवी पाटील काकी, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील तसेच नगरसेवक संग्रामसिंह दिलीपराव पाटील, नगरसेविका पल्लवी राहुल नागे, राहुल नागे, राजाराम जाधव व इतर सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या नगरपालिकेमार्फत मार्गी लावण्याचा विश्वास दिला.
या घटनेमुळे लोकसंवादातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या उपक्रमाला प्रत्यक्षात यश मिळाल्याचे दिसून आले आहे.










