भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
कांदिवली पश्चिम येथे धनगर समाज विकास मंडळाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या जल्लोषात संपन्न झाली.रविवार दिनांक ३१ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता चारकोप या ठिकाणी धनगर समाज बांधवांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता, सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प हार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी धनगर समाजाचे जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते व मंडळाचे संस्थापक सदस्य आणि प्रवक्ते भारत कवितके यांनी सांगितले की,” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी अहिल्या नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी झाला.त्यांच्या वडीलाचे नाव माणकोजी शिंदे व आईचे नाव सुशिलाबाई होते,पतीचे नाव खंडेराव, सासरे मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी धर्मशाळा, रस्ते, बारवा,तलाव,
विहिरी, मंदिर जिर्णोध्दार, वगैरे वगैरे सामाजिक कार्य केले.त्यांनी नेहमी समाज हिताची, मानवतावादी कार्य त्यांनी केले,त्यांचा मृत्यू १३ आगस्ट १७९५ रोजी झाला.”तसेच या वेळी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पिसे, संस्थापक सदस्य सदानंद लाळगे, यांनी या जयंती निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर उपयुक्त माहिती सांगितली.यावेळी ” येळकोट येळकोट जय मल्हार” घोषणा देण्यात आल्या.महिलांनी या प्रसंगी हळदी कुंकू समारंभ पार पाडला.या वेळी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पिसे, सचिव नारायण पिसे, कार्याध्यक्ष सुनील भगत, आप्पासाहेब कुचेकर, संतोष पिसे, मल्हारी लाळगे, सदानंद लाळगे, सतिश पिसे, अर्चना लाळगे, सुरेखा कुचेकर, शैलजा कुचेकर, आशा भगत, सोनाली कुचेकर, रोहिणी पिसे,संध्या पिसे,व इतर समाज बांधव व भगिनी जयंती निमित्त उपस्थित होते,










