विकासाच्या नावाखाली यशवंत चौकाचा रखडलेला विकास; नागरिकांमध्ये संताप
सेलू, ता. 31 मे : शहरातील महत्त्वाच्या यशवंत चौक परिसरातील विकासकामे रखडल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचे काम सुरू असले तरी ते संथ गतीने होत असल्याने वाहतूक कोंडी, धुळीचे प्रदूषण आणि अपघातांचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, यशवंत चौक हा शहरातील प्रमुख वर्दळीचा भाग असून येथे अनेक शासकीय कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने तसेच शाळा-महाविद्यालयांकडे जाणारा मार्ग आहे. मात्र रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. वाहनचालकांना खड्डे, उखडलेले रस्ते आणि पर्यायी मार्गांच्या अभावामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.
व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, रस्त्याच्या कामामुळे ग्राहकांची वर्दळ कमी झाली असून व्यवसायावर परिणाम होत आहे. धुळीमुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण होत आहेत. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून काम पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला प्रश्न उपस्थित करत, “विकासाच्या नावाखाली यशवंत चौकाचा विकास नेमका कधी पूर्ण होणार?” असा सवाल केला आहे. तसेच कामाची गती वाढवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, संबंधित विभागाने काम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात कामाची गती वाढण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.आता पावसाचे दिवस समोर आले असून या काळात संपूर्ण खड्डे पाण्यानी भरून अपघात जास्त प्रमाणात वाढेल असे सेलू कर यांची तक्रार समोर येत आहे. या होणाऱ्या अपघाताला संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणी प्रशासन जिम्मेदार राहील अशी सेलू करानी विरोध वेक्त केला आहे.











