गरीब शेतकरी कुटुंबातील रोहित जाधव यांची भारतीय सैन्यात निवड; गावाचा अभिमान वाढवला
नाशिक | प्रतिनिधी : सुनिल बोराडे
जिद्द, मेहनत आणि परिस्थितीवर मात करण्याची इच्छाशक्ती असेल तर यश नक्कीच मिळते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शेणीत गावातील रोहित संतोष जाधव होय. अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रोहित यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारतीय सैन्य दलात स्थान मिळवून आपल्या कुटुंबासह संपूर्ण गावाचा अभिमान वाढवला आहे.
रोहित यांचे वडील कै. संतू राजाराम जाधव यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. मात्र, या कठीण परिस्थितीत खचून न जाता रोहित यांनी शिक्षणासोबतच आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवले.
गरीबी, संघर्ष आणि अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी सातत्याने मेहनत घेतली. आपल्या आईचे कष्ट आणि कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते अखेर सत्यात उतरवले.
भारतीय सैन्य दलात निवड झाल्याने रोहित यांनी आपल्या दिवंगत वडिलांचे स्वप्न पूर्ण केले असून आईचा मान उंचावला आहे. त्यांच्या या यशामुळे शेणीत गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रोहित जाधव यांचे यश हे ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असून कठोर परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
रोहित संतोष जाधव यांचे भारतीय सैन्यात निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व देशसेवेसाठी शुभेच्छा! 🇮🇳💐👏











