• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सातारा-देवळाई परिसर पाण्यासाठी वंचित; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा-देवळाई परिसर हा महापालिकेला मोठ्या प्रमाणात कर (टॅक्स) भरणारा भाग मानला जात असला, तरी आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषतः पाणीटंचाईच्या समस्येमुळे येथील रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

RelatedPosts

वीर योद्धा प्रतिष्ठानकडून वारकऱ्यांना फळे व पाणी बाटल्यांचे वाटप; माऊलींच्या भक्तांची सेवाभावी परंपरा जपली

वाहेगाव-साळ परिसरात लोडशेडिंगमुळे विद्यार्थी व नागरिक त्रस्त; वेळ बदलण्याची मागणी

रेणापूरमध्ये SIR-2026 मोहिमेला वेग; मतदार पडताळणीचे काम युद्धपातळीवर

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जानेवारी महिन्यापासून या परिसरातील बहुतांश नागरिकांना पाण्यासाठी खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत गेल्याने टँकरच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. सुरुवातीला सुमारे ३०० रुपयांना मिळणारा पाण्याचा टँकर आता जवळपास दुप्पट दराने घ्यावा लागत असून, त्यासाठीही दोन दिवस अगोदर नोंदणी करावी लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना याबाबत वारंवार विचारणा केल्यानंतरही तातडीचा दिलासा मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिसरात नियमित पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी अजून किमान दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे सांगण्यात येत असल्याने रहिवाशांमध्ये नाराजी वाढत आहे.

महापालिकेच्या टँकर सुविधेबाबतही नागरिकांनी असमाधान व्यक्त केले आहे. एक दिवसाआड केवळ २०० लिटर पाण्याचा ड्रम उपलब्ध करून दिला जात असल्याचे सांगण्यात येते. दहा जणांच्या कुटुंबासाठी किंवा एका इमारतीतील अनेक कुटुंबांसाठी हे प्रमाण अत्यंत अपुरे असल्याने ही व्यवस्था व्यवहार्य नसल्याची भावना व्यक्त होत आहे.

पाणीटंचाईच्या वाढत्या समस्येमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.

स्थानिक रहिवासी शंतनू कृष्णराव पोळ यांनी प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन सातारा-देवळाई परिसराला नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.

पाणी ही मूलभूत गरज असून कर भरणाऱ्या नागरिकांना त्यासाठी संघर्ष करावा लागणे ही दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Previous Post

एससी प्रवर्गाचे उपवर्गीकरण करून लोकसंख्येनुसार आरक्षण द्या; लहुजी शक्ती सेनेचे निवेदन

Next Post

खडकवासला कालव्यात बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडला; शोधमोहीमेदरम्यान महिलेचे प्राण वाचवले

Related Posts

ताज्या घडामोडी

वीर योद्धा प्रतिष्ठानकडून वारकऱ्यांना फळे व पाणी बाटल्यांचे वाटप; माऊलींच्या भक्तांची सेवाभावी परंपरा जपली

July 17, 2026
22
ताज्या घडामोडी

वाहेगाव-साळ परिसरात लोडशेडिंगमुळे विद्यार्थी व नागरिक त्रस्त; वेळ बदलण्याची मागणी

July 17, 2026
13
ताज्या घडामोडी

रेणापूरमध्ये SIR-2026 मोहिमेला वेग; मतदार पडताळणीचे काम युद्धपातळीवर

July 16, 2026
15
ताज्या घडामोडी

महिला स्वायंसहाय्यता बचतगटांचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न

July 16, 2026
7
ताज्या घडामोडी

मुंगसापूर बोगस डॉक्टरप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा अहवाल; उपोषणानंतर प्रशासनाची कारवाई

July 16, 2026
67
ताज्या घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडून ‘उल्लास-नवभारत साक्षरता वारी २०२६’ प्रकल्पास शुभेच्छा

July 16, 2026
4
Next Post
खडकवासला कालव्यात बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडला; शोधमोहीमेदरम्यान महिलेचे प्राण वाचवले

खडकवासला कालव्यात बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडला; शोधमोहीमेदरम्यान महिलेचे प्राण वाचवले

ताज्या बातम्या

वीर योद्धा प्रतिष्ठानकडून वारकऱ्यांना फळे व पाणी बाटल्यांचे वाटप; माऊलींच्या भक्तांची सेवाभावी परंपरा जपली

July 17, 2026

पावसाच्या मध्यम सरींमुळे परंडा तालुक्यातील पिकांना जीवदान; शेतकऱ्यांमध्ये समाधान

July 17, 2026

गोधणी येथे मानसिक आजाराने त्रस्त युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In