प्रतिनिधी
पैलवान सुभाष दादा पाटील युथ फाउंडेशनतर्फे आयोजित राष्ट्रीय पुरस्कार सोहळा २०२६ नुकताच ७ जून रोजी उत्साहात पार पडला. यावेळी वारकरी संप्रदाय, समाजप्रबोधन आणि धर्मप्रसार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हिंदू रत्न ह.भ.प. शांताराम महाराज साळुंखे यांना ‘वारकरी भूषण पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना फाउंडेशनचे संस्थापक पैलवान सुभाष दादा पाटील यांनी सांगितले की, ह.भ.प. शांताराम महाराज साळुंखे हे कीर्तन, प्रवचन आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून देव, देश आणि धर्माचा प्रचार-प्रसार करत असून समाजपरिवर्तनाचा वसा त्यांनी हाती घेतला आहे. त्यांच्या दीर्घकालीन आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ह.भ.प. शांताराम महाराज साळुंखे हे सध्या अखिल भारतीय वारकरी मंडळ, सातारा जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वारकरी मंच, सातारा जिल्हा कोषाध्यक्ष, लोकहित माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटना, सातारा जिल्हाध्यक्ष तसेच पोलीस मित्र गुन्हे नियंत्रण महाराष्ट्र राज्य या संघटनांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत असून समाजहितासाठी सातत्याने कार्यरत आहेत.
पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर विविध सामाजिक, धार्मिक आणि वारकरी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ पालखी सोहळ्यातील दिंड्या व वारकरी बांधवांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास हिंदू रत्न ह.भ.प. दिलीप पाटील, ह.भ.प. किशोर महाराज जाधव, ह.भ.प. निरंजन महाराज, ह.भ.प. सुरेंद्रनाथ कणसे, सुधीर महाराज काले तसेच प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे यां



