पाटण | प्रतिनिधी | १३ जून २०२६
दौलतनगर येथे आयोजित अभ्यागत भेट व जनसंवाद कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या विविध समस्या, अडचणी आणि मागण्या जाणून घेतल्या.
या कार्यक्रमात नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, वीज समस्या, महसूल विषयक प्रश्न, शासकीय योजनांचा लाभ तसेच पेन्शन प्रकरणांबाबत निवेदने सादर केली. नागरिकांच्या समस्या समजून घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. त्यांना पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.
यावेळी बोलताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जनतेच्या समस्या सोडवणे, शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि विकासकामांना गती देणे हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचे नमूद केले.
नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या. जनतेशी थेट संवाद साधण्याच्या या उपक्रमामुळे स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीस चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


