रावेर | प्रतिनिधी :
आदिवासी कोळी बहुउद्देशीय शिखर संस्था, रावेर यांच्या वतीने संपूर्ण समाजाची भव्य सभा व समाज मेळावा आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय संस्थेच्या संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत घेण्यात आला.
दि. १४ जून २०२६ रोजी तांदलवाडी येथे आयोजित करण्यात आलेली ही बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत तालुक्यातील विविध सामाजिक प्रश्न, संस्थेचा प्रसार-प्रचार, समाज विकासासाठीची भावी दिशा तसेच आगामी उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी संस्थेमार्फत राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. समाजातील एकोपा अधिक दृढ करण्यासाठी तसेच युवक, महिला आणि विद्यार्थ्यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी भव्य समाज मेळावा आयोजित करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.
या मेळाव्यात समाजासमोरील विविध समस्या, युवक व महिलांचे सक्षमीकरण, शैक्षणिक प्रगती, रोजगाराच्या संधी, सामाजिक ऐक्य, शासकीय योजनांचा लाभ तसेच समाजहिताच्या विविध विषयांवर चर्चा होणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
बैठकीस संस्थेचे अध्यक्ष Manohar Pandit Koli, उपाध्यक्ष Vinod Ramchandra Koli, सचिव Yogeshwar Vishwanath Koli, सहसचिव Subhash Sukdev Sapkale, खजिनदार Vicky Krishna Koli, कार्याध्यक्ष Bhushan Prakash Tayde, प्रसिद्धी प्रमुख Shubham Sunil Koli यांच्यासह सल्लागार, संचालक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच अशोक रामदास कोळी, किरण सोपान कोळी, गोपाळ सुधाकर कोळी, विनोद रामदास कोळी, संतोष वामन सपकाळे, हरीलाल रमेश कोळी, संदीप तुकाराम महाले, विजय देविदास कोळी, सुपडू दोधू मोरे, समाधान सदाशिव कोळी, ईश्वर शालीग्राम कोळी, विनोद मिठाराम कोळी, जयराम चिंतामण कोळी, शरद सुपडू कोळी, उमेश मोहन कोळी आणि ज्ञानेश्वर पुंडलिक खवले यांच्यासह संचालक मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.
बैठकीचे नियोजन व आयोजन सचिव योगेश्वर विश्वनाथ कोळी यांनी केले. बैठकीनंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या भव्य समाज मेळाव्यात जास्तीत जास्त समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आदिवासी कोळी बहुउद्देशीय शिखर संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
