• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

३६५ दिवसांची पाणीपट्टी; प्रत्यक्षात पाणी फक्त १२१ दिवस !

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in Blog
0
0
SHARES
30
VIEWS
Ad 1

नागरिकांवर अन्याय; पाणीपट्टी धोरणाचा फेरविचार करण्याची मागणी

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरातील पाणीपुरवठा आणि पाणीपट्टी वसुलीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून, महानगरपालिकेकडून वर्षभराची पाणीपट्टी आकारली जात असताना प्रत्यक्षात नागरिकांना केवळ १२१ दिवसच पाणीपुरवठा होत असल्याचा मुद्दा समोर आला आहे. नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी हा विषय उपस्थित करत नागरिकांना मिळणाऱ्या सेवेनुसारच पाणीपट्टी आकारावी, अशी मागणी केली आहे.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

सध्या शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने वर्षभरात सरासरी १२१ दिवसच नळांना पाणी मिळते. मात्र महानगरपालिका संपूर्ण ३६५ दिवसांची पाणीपट्टी वसूल करत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. “न मिळालेल्या पाण्यासाठी शुल्क आकारणे अन्यायकारक आहे,” अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात नगरसेविका वैशाली पाटील यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदन सादर केले असून, प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याच्या दिवसांनुसार पाणीपट्टी आकारावी किंवा शहरात नियमित दररोज पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा व्यापक लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

महानगरपालिकेच्या माहितीनुसार शहरात सुमारे १ लाख ३४ हजार मालमत्ता असून अमृत योजनेअंतर्गत हजारो नवीन पाणी जोडण्या देण्यात आल्या आहेत. पाणीपट्टीतून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होत असतानाही नागरिकांना अपेक्षित दर्जाचा आणि नियमित पाणीपुरवठा मिळत नसल्याची तक्रार सातत्याने होत आहे.

शहरातील अनेक भागांत कमी दाबाने पाणी येणे, वेळेत पाणीपुरवठा न होणे तसेच वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्याबरोबरच पाणीपट्टी आकारणीबाबत पारदर्शक आणि न्याय्य धोरण राबविण्याची मागणी जोर धरत आहे.

“जेवढे दिवस पाणी मिळते, तेवढ्याच दिवसांची पाणीपट्टी आकारावी किंवा नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करावा. न मिळालेल्या पाण्याचे शुल्क आकारणे योग्य नाही,” असे नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी म्हटले आहे.

Previous Post

खुडूस केंद्राचे नूतन केंद्रप्रमुख अनिल पवार यांचे स्वागत

Next Post

श्रीकांत देवकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
3
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
173
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
52
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
13
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
96
Next Post

श्रीकांत देवकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

ताज्या बातम्या

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

August 6, 2026

पातूरमध्ये माजी नगराध्यक्ष व नगरसेवकात हाणामारी

August 6, 2026
ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

August 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In