• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

इचलकरंजी राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेस टाकळी ग्रामस्थांचा विरोध; विशेष ग्रामसभेत ठराव मंजूर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड प्रतिनिधी :

शिरोळ तालुक्यातील दानवाड येथील कृष्णा-दुधगंगा नद्यांच्या संगमावरून इचलकरंजी शहरासाठी प्रस्तावित राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेस टाकळी ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवत विशेष ग्रामसभेत एकमताने विरोधाचा ठराव मंजूर केला.

RelatedPosts

वाळकी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

कुरुंदवाड व परिसरात महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

पंचगंगा नदी प्रदूषण आंदोलन; प्रांताधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर प्राणांतिक उपोषण मागे

दरवर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना इचलकरंजी शहराची पाणी योजना स्थानिक भागावर लादल्यास परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. यासंदर्भात विशेष ग्रामसभा बोलावण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार प्रशासक रवी कांबळे यांच्या आदेशाने व उपस्थितीत ग्रामसभा पार पडली. ग्रामसेवक मुल्ला यांनी सभेचे स्वागत केले.

यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, विनोद पाटील, रणजीत पाटील, बी. एस. पाटील आणि अमर पाटील यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

ग्रामसभेत बोलताना उपस्थितांनी सांगितले की, राजापूर बंधाऱ्याजवळ महाराष्ट्राची पाण्याची हद्द संपते. दुधगंगा नदी उन्हाळ्यात कोरडी पडते. टाकळी गावातील लोकांनी काळमवाडी धरणासाठी जमिनी दिल्या, मात्र आजही गावाला पुरेसे पाणी मिळत नाही. दरवर्षी पिके वाळतात आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो.

इचलकरंजी शहराच्या प्रदूषित पाण्यामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या प्रदूषणात वाढ झाल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला. टाकळी गावाने नुकतीच दुधगंगा नदीवर नवीन पेयजल योजना सुरू केली असून, प्रस्तावित योजनेमुळे त्या योजनेलाही पाणीटंचाईचा फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

यापूर्वी कुरुंदवाड येथून इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यात आला होता. पुन्हा शिरोळ तालुक्यातून पाणी मागणे योग्य नसल्याचा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.

ग्रामसभेत “आमच्या हक्काचे पाणी देणार नाही” अशा घोषणा देत राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेस विरोधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच या ठरावाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा विभाग आणि जिल्हाधिकारी यांना पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी संभाजी पाटील, श्रीधर भोसले, विजय पाटील, संतोष गायकवाड, नवनाथ पाटील, रोहन पाटील, तातोबा शिरहट्टी, अरुण पाटील, आनंदराव पाटील, किरण पाटील, संजय पाटील, सुशील पाटील, धनाजी पाटील, रणजीत पाटील, सागर पाटील, अजित पाटील, शशिकांत कदम, रोहित शिरहट्टी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

पंढरपूर-कुर्डूवाडी रोडवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Next Post

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या फोटोवर दुग्धाभिषेक

Related Posts

ताज्या घडामोडी

वाळकी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

June 17, 2026
38
ताज्या घडामोडी

कुरुंदवाड व परिसरात महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

June 17, 2026
14
ताज्या घडामोडी

पंचगंगा नदी प्रदूषण आंदोलन; प्रांताधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर प्राणांतिक उपोषण मागे

June 17, 2026
1
ताज्या घडामोडी

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या फोटोवर दुग्धाभिषेक

June 17, 2026
4
ताज्या घडामोडी

सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

June 17, 2026
69
ताज्या घडामोडी

राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी श्रद्धापूर्वक साजरी

June 17, 2026
14
Next Post

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या फोटोवर दुग्धाभिषेक

ताज्या बातम्या

सेवाग्राम पोलिसांकडून मोटार चोरीचे गुन्हे उघड; 6.43 लाखांचा मुद्देमाल जप्त

June 17, 2026

बोरी कोकाटे येथे व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; गावात हळहळ

June 17, 2026

हिवरा तांडा येथे अवैध मोहा दारू निर्मितीवर पोलिसांची धाड; 6.40 लाखांचा मुद्देमाल जप्त

June 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In