पाटण | प्रतिनिधी :
सातारा–सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विटा येथील सुरभी मंगल कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेना मतदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांना मतदान करण्याचे आदेश असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. तसेच महायुतीचा धर्म पाळत सर्व शिवसैनिकांनी एकजुटीने काम करून उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीस आमदार सुहास बाबर, शिवसेनेचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य तसेच मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री शंभूराज देसाई यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत, “शिवसेना पूर्ण ताकदीने महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभी आहे,” असे स्पष्ट केले.
यानंतर रहिमतपूर येथे श्री. वासुदेव माने यांच्या घरी सदिच्छा भेट देण्यात आली. यावेळी स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
