प्रतिनिधी :
शिव-शाहू-फुले-आंबेडकरी चळवळीतील सक्रिय व्यक्तिमत्त्व तसेच सामाजिक न्यायासाठी सातत्याने लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुभाष गोपाळराव लोंढे (आण्णा) यांना सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड्स, दिल्ली यांच्या वतीने “Best Achiever’s Award” अंतर्गत उत्कृष्ट “सेवारत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
दि. १३ जून २०२६ रोजी आयोजित विशेष समारंभात त्यांना जागतिक स्तरावरील हा सन्मान बहाल करण्यात आला. वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, मानवाधिकार संरक्षण, महिला शोषण, कामगार प्रश्न, बालमजुरी, बालविवाह, जातीभेद, भ्रष्टाचार, सामाजिक अन्याय, अॅट्रॉसिटी प्रकरणे, भूमिहीनांना न्याय, दलित वस्त्यांचा विकास तसेच मूलभूत सुविधांसाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
डॉ. लोंढे यांनी सरकारी जागांवरील रहिवासी अतिक्रमणांचे नियमितीकरण, वनजमिनीवरील दलित वस्त्यांसाठी निर्वनीकरण (Disforest) मोहीम, भूमिहीनांना शासकीय जागा उपलब्ध करून देणे, रमाई घरकुल व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मिळवून देण्यासाठी पाठपुरावा, दलित वस्त्यांमध्ये रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, वीज, सोलर पॅनेल, समाजमंदिर, संविधान सभागृह उभारणी यांसारख्या विविध लोकाभिमुख उपक्रमांवर विशेष भर दिला आहे.
“वस्ती जिथे अंगणवाडी तिथे” हा उपक्रम दलित वस्त्यांमध्ये राबवून बालशिक्षण आणि सामाजिक जागृतीचे कार्यही त्यांनी केले आहे. तसेच सामाजिक न्याय आणि हक्कांसाठी त्यांनी अनेक वर्षे सातत्याने संघर्ष करत जनजागृतीची चळवळ उभी केली आहे.
मानवअधिकार Masso. तसेच भारतीय प्रशासकीय जन शिकायत सुधार परिषद, दिल्ली या संस्थांमध्ये “दक्षता अधिकारी” या राष्ट्रीय पदावर कार्यरत असल्यामुळे त्यांची ओळख देशभर निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड्स, दिल्ली यांनी त्यांना या पुरस्कारासाठी आमंत्रित केले होते.
या सन्मानामुळे सांगली जिल्ह्यातील तासगाव, खानापूर (विटा), आटपाडी तसेच पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. डॉ. सुभाष लोंढे यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्रासह देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
