नाशिक प्रतिनिधी
कसारा शहरामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, विद्युत लोकोशेड कल्याण यांच्या सौजन्याने तसेच सुनंदाताई बबन जाधव/बागुल (ग्रामपंचायत सदस्य, मोखवणे-कसारा), बागुल बंधू वडापाव सेंटर आणि सर्व मित्र परिवार यांच्या वतीने कसारा गावासाठी पाण्याचा टँकर उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील काही दिवसांपासून कसारा गावातील पिण्याच्या पाण्याचे प्रमुख तळे आटल्यामुळे गावात अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. पिण्यासाठीच नव्हे तर दैनंदिन वापरासाठीही पाणी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि ग्रामपंचायत कसारा यांच्या माध्यमातून सातत्याने चर्चा सुरू होती.
याच अनुषंगाने नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री कॉम्रेड वेणू नायर यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा गावात पाण्याचा टँकर उपलब्ध करून देण्यात आला. या उपक्रमामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले आहेत.
हे कार्य यशस्वी करण्यासाठी राहुल रमेश गाडे, कॉम. अनिल चंद्र मोरे, कॉम. चेतन दोंदे, कॉम. सागर होळकर, कॉम. सचिन पगारे, कॉम. शशिकांत बर्वे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष संदीप पवार तसेच सागर भडांगे (उपाध्यक्ष, कसारा विभाग) यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
