नाशिक | प्रतिनिधी
आर्थिक अडचणींमुळे नववी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या एका विद्यार्थ्याला शाळेची थकित फी भरता येत नसल्याने आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे मिळण्यात अडचणी येत होत्या. ही बाब समोर येताच जयश्रीताई आहिरे यांनी तत्काळ पुढाकार घेत संबंधित विद्यार्थ्याला ₹१५ हजारांची आर्थिक मदत केली.
या मदतीमुळे विद्यार्थ्याची थकीत फी भरली गेली असून त्याला आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे मिळाली आहेत. त्यामुळे त्याच्या पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यार्थ्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी जयश्रीताई आहिरे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
समाजातील गरजू, होतकरू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी कायम तत्पर असलेल्या युवा क्रांती फाउंडेशन च्या माध्यमातून जयश्रीताई आहिरे सातत्याने सामाजिक कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, सेवाभावी उपक्रमांमुळे संस्थेला नवी ओळख मिळत आहे.
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिलेली ही मदत अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, “शिक्षण थांबता कामा नये” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.







