धामोरी | प्रतिनिधी : भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी धामोरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.
या उद्घाटन कार्यक्रमाला धामोरी गावच्या पोलीस पाटील सौ. संगीता विजयराव ताजने प्रमुख उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते लहान बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी त्यांनी पालकांना आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लस देण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, “पोलिओमुक्त भारताचे स्वप्न कायम राखण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला पोलिओचे दोन थेंब देणे ही सामूहिक जबाबदारी आहे. कोणतेही मूल या लसीकरणापासून वंचित राहू नये.”
या मोहिमेद्वारे गावातील सर्व पात्र बालकांपर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचविण्याचा निर्धार करण्यात आला. आरोग्य विभागाचे अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ आणि पालकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे आणि पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
