• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ग्रामसभेत व्हिडिओ शूटिंगला बंदी योग्य आहे का? कोकणातील नागरिकांमध्ये चर्चा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :

कोकणातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभेच्या कामकाजाबाबत पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ग्रामसभेदरम्यान गावातील नागरिकांनी व्हिडिओ शूटिंग करणे योग्य की अयोग्य, यावर सध्या नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

RelatedPosts

किनवट तालुक्यात गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा; ग्राहकांना तासन्तास रांगेत उभे राहण्याची वेळ

मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाळधी-पोखरी चौफुलीवरील अपघातांची गंभीर दखल

शाहूवाडीत खळबळ! ३८ हजारांची लाच घेताना PWD शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

ग्रामसभा ही गावाच्या विकासासाठी आयोजित केली जाणारी खुली आणि सार्वजनिक सभा असते. ग्रामस्थांना गावातील विकासकामे, निधी, विविध योजना, खर्च आणि प्रशासनाच्या निर्णयांबाबत प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो. मात्र, काही ठिकाणी ग्रामसभेदरम्यान नागरिकांना मोबाईलद्वारे व्हिडिओ शूटिंग करण्यास मज्जाव करण्यात येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही अधिकारी आणि पदाधिकारी “परवानगी घेतल्याशिवाय व्हिडिओ शूटिंग करू नका” असे सांगत दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ग्रामसभेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.

कोकणातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभेला पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचेही चित्र आहे. कोरम पूर्ण न झाल्यामुळे अनेक वेळा ग्रामसभा तहकूब करावी लागते. गावाच्या विकासासाठी तरुणांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने ग्रामसभेत सहभागी होणे आवश्यक असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

ग्रामस्थांच्या मते, ग्रामसभेत १०० पेक्षा अधिक नागरिक उपस्थित राहिल्यास गावातील प्रश्नांवर सखोल चर्चा होऊ शकते. सरपंच, सदस्य आणि अधिकारी यांना थेट प्रश्न विचारून विकासकामांचा आढावा घेता येतो. त्यामुळे गावाच्या विकास प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढण्यास मदत होते.

“कोकणातील तरुणांनी ग्रामसभेकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. अन्यथा भविष्यात गाव ओस पडण्याची भीती आहे,” अशी भावना काही ग्रामस्थांनी व्यक्त केली.

दरम्यान, ग्रामसभा सार्वजनिक असल्याने व्हिडिओ शूटिंगबाबत स्पष्ट नियम काय आहेत, याबाबत प्रशासनाने जनजागृती करावी आणि पारदर्शकतेसाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

“कोकण निसर्ग म्हणजे स्वर्ग आहे; पण गावांचा विकासही तितकाच महत्त्वाचा आहे,” अशी भावना शेवटी नागरिकांनी व्यक्त केली.

Tags: Amit Tendulakr
Previous Post

लातूर-उदगीर महामार्गावर तिहेरी अपघात; तिघेजण गंभीर जखमी

Related Posts

ताज्या घडामोडी

किनवट तालुक्यात गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा; ग्राहकांना तासन्तास रांगेत उभे राहण्याची वेळ

July 3, 2026
3
ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाळधी-पोखरी चौफुलीवरील अपघातांची गंभीर दखल

July 3, 2026
4
क्राईम

शाहूवाडीत खळबळ! ३८ हजारांची लाच घेताना PWD शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

July 3, 2026
6
ताज्या घडामोडी

पिवंदळ बु. परिसरात वन्यप्राण्यांचा हैदोस; शेतकरी हवालदिल

July 3, 2026
21
ताज्या घडामोडी

परतूर नगरपरिषदेच्या कारभारावर नागरिकांचा संताप; पाणीटंचाई व अस्वच्छतेमुळे तीव्र नाराजी

July 3, 2026
0
ताज्या घडामोडी

सरण आंदोलनाला यश; भगूर–पांढुर्ली रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात

July 3, 2026
0

ताज्या बातम्या

ग्रामसभेत व्हिडिओ शूटिंगला बंदी योग्य आहे का? कोकणातील नागरिकांमध्ये चर्चा

July 3, 2026

लातूर-उदगीर महामार्गावर तिहेरी अपघात; तिघेजण गंभीर जखमी

July 3, 2026

किनवट तालुक्यात गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा; ग्राहकांना तासन्तास रांगेत उभे राहण्याची वेळ

July 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In