• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुशाफिरी यात्रेचा लिंपणगावात समारोप; भटके-विमुक्तांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची ग्वाही

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा, प्रतिनिधी :
भटके-विमुक्त आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नांचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी राजकीय सत्तेत सहभाग आवश्यक असून समाजाने एकजुटीने पुढे यावे, असे आवाहन Sujat Ambedkar यांनी केले.

भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने संत कबीर जयंतीनिमित्त लिंपणगाव येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरातील सभागृहात आयोजित मुशाफिरी यात्रा समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक व भटके-विमुक्त नेते Laxman Gaikwad होते.

RelatedPosts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

यावेळी स्वागताध्यक्ष तथा Vanchit Bahujan Aghadi चे राज्य प्रवक्ते Adv. Dr. Arun Jadhav, Umattai Jadhav, Prasad Bhivasane, नगरसेविका Sangeeta Bhalerao आदी उपस्थित होते.

सुजात आंबेडकर म्हणाले की, भटके-विमुक्त समाजाने स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले, मात्र स्वातंत्र्यानंतरही या समाजाला घर, जमीन, शिक्षण, रेशन आणि मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. या प्रश्नांच्या निराकरणासाठी वंचित बहुजन आघाडीने भटके-विमुक्तांना सत्तेत प्रतिनिधित्व मिळवून देण्याचा संकल्प केला आहे.

यावेळी त्यांनी ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत भटके-विमुक्त समाजासाठी ते प्रभावी नेतृत्व म्हणून पुढे येत असल्याचे सांगितले आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात लक्ष्मण गायकवाड यांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही भटके-विमुक्त समाज अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. समाजाने अंधश्रद्धा आणि जुन्या रूढी-परंपरा सोडून शिक्षणाचा मार्ग स्वीकारावा आणि B. R. Ambedkar यांच्या विचारांवर चालत संघटित व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी सांगितले की, घरगणना व जनगणना प्रक्रियेत भटके-विमुक्तांच्या पाल आणि तात्पुरत्या निवासस्थानांची नोंद करण्यासाठी आवश्यक व्यवस्था नसल्याने अनेक कुटुंबे वंचित राहण्याची शक्यता आहे. मुशाफिरी यात्रेदरम्यान समाजात जनजागृती करून अनेक कुटुंबांची घरगणना होण्यास मदत झाली असून, भटके-विमुक्तांच्या प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलने, मोर्चे आणि निवेदने देत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात Balasaheb Bale, Lata Sawant आणि Anil Ghanwat यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा संविधानाच्या उद्देशिकेची प्रत देऊन सत्कार करण्यात आला. Samata Sainik Dal च्या वतीने मानवंदना देण्यात आली तसेच कार्यक्रमासाठी चोख बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली.

Previous Post

पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून विवाहित तरुणाची आत्महत्या; चौघांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

लौकी येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

Related Posts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
170
ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

August 15, 2026
28
ताज्या घडामोडी

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

August 15, 2026
81
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर
ताज्या घडामोडी

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

August 6, 2026
7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
31
Next Post

लौकी येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In