श्रीगोंदा, प्रतिनिधी :
भटके-विमुक्त आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नांचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी राजकीय सत्तेत सहभाग आवश्यक असून समाजाने एकजुटीने पुढे यावे, असे आवाहन Sujat Ambedkar यांनी केले.
भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने संत कबीर जयंतीनिमित्त लिंपणगाव येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरातील सभागृहात आयोजित मुशाफिरी यात्रा समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक व भटके-विमुक्त नेते Laxman Gaikwad होते.
यावेळी स्वागताध्यक्ष तथा Vanchit Bahujan Aghadi चे राज्य प्रवक्ते Adv. Dr. Arun Jadhav, Umattai Jadhav, Prasad Bhivasane, नगरसेविका Sangeeta Bhalerao आदी उपस्थित होते.
सुजात आंबेडकर म्हणाले की, भटके-विमुक्त समाजाने स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले, मात्र स्वातंत्र्यानंतरही या समाजाला घर, जमीन, शिक्षण, रेशन आणि मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. या प्रश्नांच्या निराकरणासाठी वंचित बहुजन आघाडीने भटके-विमुक्तांना सत्तेत प्रतिनिधित्व मिळवून देण्याचा संकल्प केला आहे.
यावेळी त्यांनी ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत भटके-विमुक्त समाजासाठी ते प्रभावी नेतृत्व म्हणून पुढे येत असल्याचे सांगितले आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात लक्ष्मण गायकवाड यांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही भटके-विमुक्त समाज अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. समाजाने अंधश्रद्धा आणि जुन्या रूढी-परंपरा सोडून शिक्षणाचा मार्ग स्वीकारावा आणि B. R. Ambedkar यांच्या विचारांवर चालत संघटित व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी सांगितले की, घरगणना व जनगणना प्रक्रियेत भटके-विमुक्तांच्या पाल आणि तात्पुरत्या निवासस्थानांची नोंद करण्यासाठी आवश्यक व्यवस्था नसल्याने अनेक कुटुंबे वंचित राहण्याची शक्यता आहे. मुशाफिरी यात्रेदरम्यान समाजात जनजागृती करून अनेक कुटुंबांची घरगणना होण्यास मदत झाली असून, भटके-विमुक्तांच्या प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलने, मोर्चे आणि निवेदने देत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात Balasaheb Bale, Lata Sawant आणि Anil Ghanwat यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा संविधानाच्या उद्देशिकेची प्रत देऊन सत्कार करण्यात आला. Samata Sainik Dal च्या वतीने मानवंदना देण्यात आली तसेच कार्यक्रमासाठी चोख बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली.
