• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वारा ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कारवाईची मागणी…

पाटणबोरी प्रतिनिधी : पांढरकवडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वारा ग्रामपंचायतीमध्ये शासकीय अतिक्रमण हटाव मोहिमेचे वृत्तांकन करत असलेल्या एका पत्रकाराला शिवीगाळ, चारित्र्यहनन आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी पत्रकार निलेश सिडाम (वय ३४) यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात आरोपी भारत गेडाम आणि अक्षय भारत गेडाम यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ९ जून २०२६ रोजी ग्रामपंचायत वारा येथे प्रशासनामार्फत अधिकृत अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत होती. या मोहिमेचे वृत्तांकन करण्यासाठी गावातील सरपंचांनी पत्रकार निलेश सिडाम यांना अधिकृतरीत्या बोलावले होते. त्यानुसार पत्रकार सिडाम हे घटनास्थळी व्हिडिओ चित्रीकरण करत असताना आरोपी भारत गेडाम आणि अक्षय गेडाम यांनी त्यांना अडवून “व्हिडिओ बंद कर, नाहीतर परिणाम वाईट होतील,” अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

RelatedPosts

खटाव तालुक्यात पावसाचे आगमन; शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे मदतीची मागणी

पीक कापणी प्रयोगालाच प्राधान्य द्या; तांत्रिक उत्पादन पद्धत सदोष – आमदार राणाजगजितसिंह पाटील

फार्मर आयडीतील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करून शेतकऱ्यांना योजनांचा लाभ द्यावा – डॉ. प्रतापसिंह पाटील

पत्रकार सिडाम यांनी शासकीय कारवाईचे चित्रीकरण करणे कायदेशीर असल्याचे सांगितले असता आरोपी अक्षय गेडाम अधिक आक्रमक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. “ज्या दिवशी धमकी देईन त्या दिवशी तू जिवंत राहणार नाहीस,” अशा शब्दांत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.

घटनास्थळी सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सचिव, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल आणि ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी आरोपींना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी अधिकाऱ्यांशीही उद्धटपणे वागणूक दिल्याचे सांगण्यात आले.

तक्रारीनुसार आरोपी भारत गेडाम हा तेलंगणा राज्यात शिक्षक म्हणून कार्यरत असून घटनेच्या वेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने पत्रकार निलेश सिडाम यांच्याविषयी “दारू पितोस, गांजा पितोस, हप्ते खातोस,” असे खोटे आणि मानहानीकारक आरोप केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

कारवाईनंतर सर्व अधिकारी व पदाधिकारी सरपंचांच्या घरी उपस्थित असताना आरोपी अक्षय गेडाम याने पुन्हा तेथे येऊन “मी गावात कुठेही अतिक्रमण करीन, तुमच्याने जे होईल ते करून घ्या,” अशी उघड धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यापूर्वीही गावठाण जमिनीवरील बेकायदेशीर खोदकामाचे वृत्तांकन करताना पत्रकार निलेश सिडाम यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले असून, सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ व ऑडिओ पुरावेही पोलिसांकडे सादर करण्यात आले आहेत.

पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाईची मागणी

कर्तव्य बजावत असलेल्या पत्रकाराला धमकावणे, मानसिक छळ करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे या प्रकारांविरोधात आरोपी भारत गेडाम आणि अक्षय गेडाम यांच्यावर ‘महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) कायदा’ अर्थात पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार निलेश सिडाम यांनी केली आहे.

या प्रकरणात पांढरकवडा पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची धोरजा गावाला भेट; ग्रामस्थांना समस्या सोडवण्याचे आश्वासन…

Next Post

शाळा परिसरापासून ५०० मीटर अंतरात ‘स्टिंग’ विक्रीस बंदी; अन्न व औषध प्रशासनाच्या कडक कारवाईचे आदेश

Related Posts

Blog

खटाव तालुक्यात पावसाचे आगमन; शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे मदतीची मागणी

July 3, 2026
0
Blog

पीक कापणी प्रयोगालाच प्राधान्य द्या; तांत्रिक उत्पादन पद्धत सदोष – आमदार राणाजगजितसिंह पाटील

July 3, 2026
0
Blog

फार्मर आयडीतील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करून शेतकऱ्यांना योजनांचा लाभ द्यावा – डॉ. प्रतापसिंह पाटील

July 3, 2026
0
Blog

पालखेड मिरची येथे शाळेसमोर गतिरोधक बसवण्याची मागणी; मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा

July 3, 2026
0
Blog

वेताळवाडी येथे वृक्षारोपण उपक्रम उत्साहात; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

July 3, 2026
0
Blog

जवळा बाजार येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे जंगी स्वागत; भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण

July 3, 2026
15
Next Post

शाळा परिसरापासून ५०० मीटर अंतरात ‘स्टिंग’ विक्रीस बंदी; अन्न व औषध प्रशासनाच्या कडक कारवाईचे आदेश

ताज्या बातम्या

खटाव तालुक्यात पावसाचे आगमन; शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे मदतीची मागणी

July 3, 2026

पीक कापणी प्रयोगालाच प्राधान्य द्या; तांत्रिक उत्पादन पद्धत सदोष – आमदार राणाजगजितसिंह पाटील

July 3, 2026

फार्मर आयडीतील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करून शेतकऱ्यांना योजनांचा लाभ द्यावा – डॉ. प्रतापसिंह पाटील

July 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In