भुसावळ | प्रतिनिधी
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुख्मिणी दर्शनासाठी जाणाऱ्या वारकरी भाविकांसाठी आनंदाची बातमी असून भुसावळ रेल्वे स्थानकावरून विशेष आषाढी रेल्वेचे नियोजन करण्यात आले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेली ही विशेष रेल्वे भुसावळ तालुक्यासह परिसरातील वारकरी भाविकांसाठी मोठी सोय ठरणार आहे.
ही विशेष गाडी शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी दुपारी १.३० वाजता भुसावळ येथून पंढरपूरकडे रवाना होणार आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी रात्री १०.३० वाजता पंढरपूरहून भुसावळकडे सुटणार आहे.
विशेष म्हणजे, वारकरी भाविकांसाठी ही आषाढी विशेष रेल्वे पूर्णपणे मोफत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे भुसावळ तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील जास्तीत जास्त वारकरी भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
