रायगड प्रतिनिधी :
रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, रस्ते बंद होणे तसेच झाडे कोसळून वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना घडत आहेत. या नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील अनेक भागांतील जनजीवन प्रभावित झाले आहे.
अशा कठीण परिस्थितीत अलिबाग तालुक्यातील कोळगाव येथील समाजसेविका संजना पाटील या नागरिकांच्या मदतीसाठी दिवस-रात्र तत्परपणे कार्यरत आहेत. झाड कोसळणे, घरांमध्ये पावसाचे पाणी शिरणे किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीची माहिती मिळताच त्या तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी करतात. तसेच नागरिकांची विचारपूस करून त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचा प्रयत्न करतात. घराघरांत जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्यांना धीर देणे, हे त्यांचे कार्य समाजसेवेचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
याचप्रमाणे चोंढी-किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच भाऊ (पिंटया) गायकवाड हे देखील समाजहितासाठी सातत्याने कार्यरत असून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यांच्या समाजाभिमुख कार्याचेही नागरिकांकडून कौतुक होत आहे.
निस्वार्थ भावनेने समाजासाठी कार्य करणाऱ्या संजना पाटील आणि भाऊ (पिंटया) गायकवाड यांच्या सेवाभावी कार्याबद्दल परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
