नागपूर | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘अजिंक्य योद्धा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ५ जुलै २०२६ रोजी नागपूर येथील एम्प्रेस मॉलच्या नक्षत्र सभागृहात उत्साहात पार पडला.
प्रा. अरुण कणेर लिखित आणि साई ज्योती प्रकाशन, नागपूर प्रकाशित या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूरच्या महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लेखक प्रा. अरुण कणेर, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी, राज्यसभा सदस्या मायाताई इवनाते, राज्यमंत्री ॲड. आशिष जायसवाल, नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू, नागपूर शहर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आणि ‘अजिंक्य योद्धा’ या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा आढावा घेत त्यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
