📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | मतेवाडी | प्रतिनिधी
मतेवाडी गाव आणि परिसरात आज झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात आली होती. मात्र, आजच्या दमदार पावसामुळे पिकांना मोठे जीवदान मिळाले असून बळीराजा दिलासा मिळाला आहे.
दुपारच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन मतेवाडी व परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सुकू लागलेल्या खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली असून शेतीच्या कामांनाही पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे.
पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. परिसरातील रस्ते आणि शेतांमध्ये पाणी साचले असून कडक उन्हापासून नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांनी या पावसाचे स्वागत करत आगामी काळातही समाधानकारक पाऊस होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

