प्रदीप ताजने
पातूर | प्रतिनिधी |
शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीनंतर तहसीलदार व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज शेतजमिनीवरील रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी व शेतीमालाची वाहतूक सुलभ व्हावी यासाठी हा रस्ता आवश्यक असल्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती.
या पाहणी दरम्यान नायब तहसीलदार दिनकर केंद्रे, चान्नी मंडळ अधिकारी सतीश ढोरे, ग्राम महसूल अधिकारी दीपक नळकांडे, विनोद ठाकरे, मिलिंद ईचे, महसूल सेवक यशवंत घुगे, कविता वानखडे, प्रिया तायडे, तुळशीराम बुंदे यांच्यासह महसूल विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
पांगरा शिवारातील शेतकऱ्यांनी रस्त्याअभावी होणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. शेतीमालाची वाहतूक, तसेच पावसाळ्यात शेतात जाता येत नसल्याने मोठे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
रस्त्यासाठी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये देविदास काकड, कैलास पाटील, ज्ञानेश्वर येणकर, प्रमोद बंड, वासुदेव घोरे, रामा इंगळे, रवि सोनोने, ज्ञानदेव घोरे, आबाराव देशमुख, दिनकर सोनोने, पांगरा शिव चे सरपंच पंढरी गडदे, गोपाल सोनोने, पांडुरंग घोगरे, हरिदास सोनोने यांच्यासह दोन्ही शिवारातील बहुसंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






