श्रीरामपूर (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धन, वृक्ष संवर्धन आणि हरित जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हरियाली मंच यांच्यावतीने सदस्यांना बेलपत्र (बेल) या पवित्र वृक्षांची रोपे भेट स्वरूप देण्यात आली. या वेळी प्रत्येक सदस्याने रोपांचे संगोपन करून पर्यावरण संवर्धनासाठी सहभाग नोंदविण्याचा संकल्प केला.
हरित, स्वच्छ आणि प्रदुषणमुक्त परिसर निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमाची समाजाला मोठी प्रेरणा मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या प्रसंगी हरियाली मंचाच्या अध्यक्षा वर्षा झंवर, उपाध्यक्ष विजया भुतडा, सचिव भारती सोमाणी, अनिता असावा, डॉ. अर्चना सोमाणी, डॉ. सपना करवा, डॉ. सुचिता भट्टड, शीतल भुतडा, रमा फोपळे, उज्ज्वला फोपळे, संगीता राजू, राधिका करवा आदी उपस्थित होते.









