पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा पेण ‘वंदे मातरम्’ भारताच्या राष्ट्रीय गीताचा इतिहास 🇮🇳 वंदे मातरम….@150🇮🇳. ‘वंदे मातरम्’ हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे याची *:- रचना “बंकिमचंद्र चटर्जी” यांनी ७ नोव्हेंबर १८७५ रोजी केली. पुढे हे गीत त्यांनी १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत समाविष्ट केले. *राष्ट्रीय गीताचा अर्थ*:- ‘आई, मी तुला नमन करतो’ असा याचा अर्थ असून, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात या गीताने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
*राष्ट्रीय गीताची निर्मिती आणि इतिहास रचना:* बंकिमचंद्र चटर्जी यांनी हे गीत ‘संस्कृत’ आणि ‘बंगाली’ भाषेत लिहिले
राष्ट्रीय गीताचे पहिले गायन: १८९६ मधील कलकत्ता येथील काँग्रेस अधिवेशनात ‘रवींद्रनाथ टागोर’ यांनी हे गीत प्रथम गायले
राष्ट्रीय गीताची घोषणा: ७ ऑगस्ट १९०५ रोजी स्वदेशी चळवळीदरम्यान हे गीत पहिल्यांदा राजकीय घोषणा म्हणून वापरले गेले.
राष्ट्रीय दर्जा स्वीकृती: २४ जानेवारी १९५० रोजी संविधान सभेने ‘वंदे मातरम्’ ला भारताचे ‘राष्ट्रीय गीत’ (National Song) म्हणून समान मान व दर्जा दिला.
भारतीय स्वातंत्र्य लढा: ब्रिटिशांच्या काळात या गीत व घोषणेवर अनेकदा बंदी होती. क्रांतीकारकांनी हसतहसत फाशी स्वीकारताना ‘वंदे मातरम्’ हाच जयघोष केला.









